शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य हक्कापासून सरासरी २,५०७ बालके दूरच

By admin | Updated: December 26, 2016 01:44 IST

जन्म होताच सुदृढ आरोग्याकरिता नवजात बालकांकरिता आरोग्य विभागाच्यावतीने पाच बाबी त्याच्या हक्काच्या

आरोग्य विभागाकडून योजनांची अंमलबजावणी : प्रतिसाद देण्याकडे पालकांचे मात्र दुर्लक्ष रूपेश खैरी ल्ल वर्धा जन्म होताच सुदृढ आरोग्याकरिता नवजात बालकांकरिता आरोग्य विभागाच्यावतीने पाच बाबी त्याच्या हक्काच्या म्हणून सांगण्यात आल्या आहेत. यात चार लसी आणि स्तनपानाचा समावेश आहे. या बाबी नवजात बालकांना वेळीच मिळाव्या म्हणून शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्यावतीने योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र त्या योजनांना बालकांच्या पालकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यातील नोंदीनुसार सरासरी २ हजार ५०७ बालके या पाच हक्कापासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. बालकाचा जन्म होताच पहिल्या तासात मुलाला स्तनपान झाले पाहिजे, जन्माताच क्षयरोगाची लस, पोलीओ लस, काविळची लस, आणि के जीवनसत्वाची लस या पाच बाबींचा त्यांच्यात समावेश आहे. या पाच बाबी नवजात बालकाच्या हक्काच्या असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या लसी देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. असे असले तरी त्यांना पालकांकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे; मात्र वर्धा जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे असलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसून आले आहे. या पाच पैकी एकही बाब जिल्ह्यात नोंद असलेल्या बालकांना पूर्णपणे भेटली नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दोनही ठिकाणी १८ हजार ५३४ बालकांची नोंद आहे. या बालकांना राज्याच्या आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार पाच हक्क देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने नोंदी असलेल्या बालकांपैकी सरासरी ५८.३८ टक्के बालकांना या लसी दिल्याची नोंद आहे. यात बाळाचा जन्म होताच ६३.९८ टक्के बालकांना स्तनपानाचा अधिकार मिळाल्याची नोंद आहे. तर क्षयरोगाची लस ७१.३७, पोलिओची लस ७०.६२ टक्के बालकांना देण्यात आली आहे. या तीन लसी देण्याची टक्केवारी जिल्ह्यात समाधानकारक असली तरी काविळच्या लसीसंदर्भात देण्यात असलेले निम्मे उद्दिष्टही पूर्ण करणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला शक्य नसल्याचे दिसून आले आहे. नोंदी असलेल्या बालकांपैकी केवळ ४२.१९ टक्के बालकांनाच ही लस देण्यात आल्याची नोंद झाली आहे. तर क जीवनसत्त्वाची नोंद आरोग्य विभागाकडे दिसून आली नाही. उद्दिष्ट पूर्तीकरिता आरोग्य विभागाची धावपळ ४शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेतील लसी देण्याकरिता आरोग्य विभागाचे पथक जिल्हाभर नागरिकांच्या दारापर्यंत जात आहे; मात्र त्यांना बालकांच्या पालकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बालकांच्या सुदृढ आरोग्याची जबाबदारी एकट्या आरोग्य विभागाची की त्या बालकांच्या पालकांचीही असा प्रश्न येथे समोर येत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात झालेले लसीकरण ४जिल्ह्यात नोंद असलेली एकूण बालके - १८,५३४ ४जन्मताच स्तनपान मिळालेली बालके - ११,८५८ ४क्षयरोग प्रतिबंधक लस मिळालेली बालके - १३,२२८ ४पोलिसोची लस मिळालेली बालके - १०,३७५ ४काविळरोग प्रतिबधंक लस मिळालेली बालके - ७,८२० बालकाला या पाच लसी वेळीच मिळणे हा त्याचा हक्क आहे. म्हणूनच त्याला नवजात बालकाचे पाच हक्क म्हटल्या गेले आहे. या बालकांना हे हक्क देण्याकरिता आरोग्य यंत्रणा धावपळ करीत आहे; मात्र या बालकांच्या पालकांनीही त्यांची जबाबदारी ओळखून आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. - दुर्र्योधन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा