शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला मिळाले मूर्त रूप

वर्धा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे ठिकाण राहिलेल्या सेवाग्राम-पवनार येथून नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. अखेर गुरुवारी आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनार येथून या महामार्गाला प्रारंभ होणार असल्याचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे वर्धा जिल्हावासीयांसाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

नागपूर ते गोवा हा महाराष्ट्रशक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार असून, या जिल्ह्यांतील एकूण ३९ तालुक्यांतील ३७० गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांसह १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यापर्यंतचा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः आठ तासांवर येणे अपेक्षित आहे. म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला. या आदेशामुळे या शक्तिपीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यतापवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाची अंदाजित लांबी ८०२.५९२ कि.मी. असून हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यता देण्यात आली. मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यांतील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ च्या कलम ३ व कलम १५ (२) ची अधिसूचना दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

महामार्गाकरिता २० हजार ७८७ कोटींचा खर्च

महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही शासनाने मान्यता दिली. सोबतच या प्रकल्पाकरिता १२ हजार कोटी मूळ रक्कम आणि ८ हजार ७८७ कोटींचे संभावित व्याज, अशा एकूण २० हजार ७८७ कोटींच्या रकमेसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वर्धा जिल्हा हा समृद्धी महामार्गाशी जोडल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गही जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात जिल्ह्याच्या पवनार येथून करण्यास मान्यता दिली. ही वर्धा जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी असून, त्यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती, ती आज पूर्णत्वास गेली. -डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री, वर्धा.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गMaharashtraमहाराष्ट्र