शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पिकांची दाणादाण, शेतात विष पिऊन शेतकऱ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:00 IST

रत्नापूर येथील घटना : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येनं अख्खं गाव हळहळलं!

देवळी (वर्धा) : सततचा पाऊस, त्यानंतर पिकांवर आलेल्या रोगामुळे लावलेला पैसाही निघेल की नाही, या विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील पिकांची अवस्था पाहून शेतातच विष गटकले. यातच त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रत्नापूर येथे मंगळवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली.

दिनेश नानाजी मडावी (३८) रा. रत्नापूर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत व त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे वडिलोपार्जित ३ हेक्टर ५४ आर शेती असून, त्यावर बँक ऑफ इंडिया भिडी शाखेचे एक लाखाचे कर्ज आहे. दोन महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने ही शेती तिघा भावांत विभागली गेली. त्यामुळे मृताच्या नावे पावणेतीन एकर शेती आली असून, त्यामध्ये सोयाबीन व कपाशीची लागवड केली. या पिकाची अवस्था वाईट असून लागवडीकरिता पैसा नाही. बँकही नव्याने कर्ज द्यायला तयार नाही, यामुळे विवंचनेत असलेल्या दिनेशने मंगळवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.

दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. मृताच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तलाठी मरस्कोले यांनीही पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना पाठविला. पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूwardha-acवर्धा