शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पिकांची दाणादाण, शेतात विष पिऊन शेतकऱ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:00 IST

रत्नापूर येथील घटना : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येनं अख्खं गाव हळहळलं!

देवळी (वर्धा) : सततचा पाऊस, त्यानंतर पिकांवर आलेल्या रोगामुळे लावलेला पैसाही निघेल की नाही, या विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील पिकांची अवस्था पाहून शेतातच विष गटकले. यातच त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रत्नापूर येथे मंगळवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली.

दिनेश नानाजी मडावी (३८) रा. रत्नापूर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत व त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे वडिलोपार्जित ३ हेक्टर ५४ आर शेती असून, त्यावर बँक ऑफ इंडिया भिडी शाखेचे एक लाखाचे कर्ज आहे. दोन महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने ही शेती तिघा भावांत विभागली गेली. त्यामुळे मृताच्या नावे पावणेतीन एकर शेती आली असून, त्यामध्ये सोयाबीन व कपाशीची लागवड केली. या पिकाची अवस्था वाईट असून लागवडीकरिता पैसा नाही. बँकही नव्याने कर्ज द्यायला तयार नाही, यामुळे विवंचनेत असलेल्या दिनेशने मंगळवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.

दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. मृताच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तलाठी मरस्कोले यांनीही पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना पाठविला. पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूwardha-acवर्धा