शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं ‘तेरवं’ ‘भारत रंग’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:41 IST

Wardha News आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनाटकातून विधवा पत्नींच्या मांडल्या व्यथा

वर्धा: मर्द शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांच्या विधवा बायका मात्र जगण्याशी दोन हात करीत मर्दानी संघर्ष करतात, हे सारतत्त्व असलेले, आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

श्याम पेठकर लिखित आणि हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची निर्मिती अध्ययन भारती, वर्ध्याच्या ॲग्रो थिएटरने केली आहे. या नाटकाला वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिले आहे. कोरोनापूर्व काळात या नाटकाचे मुंबई विद्यापीठाच्या नाट्यमहोत्सवात, तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर काही ठिकाणी प्रयोग झाले आहेत. पण, नंतर या नाटकाचे प्रयोग बंद पडले. देश आणि विदेशांतील ७७१ नाटकांचा अभ्यास केल्यावर भारतातून विविध प्रांत व भाषांमधील ७७ नाटके निवडण्यात आली. तसेच विदेशी रंगभूमीवरील दहा नाटकांच्या निवडीसह ८७ नाटकांचा समावेश भारत रंग महोत्सवात आहे. देशी नाटकांपैकी ‘तेरवं’ सह चार मराठी नाटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या नाटकात शेतकरी विधवा महिलांनीच काम केले आहे. महिलांचे नाट्य प्रशिक्षण घेऊन त्यातून तेरा महिलांची निवड करण्यात आली. समूह नाट्याच्या शैलीत बसविण्यात आलेल्या या नाटकाचे वैशिष्ट त्याचे संगीत हेच आहे. जात्यावरील ओव्यांच्या लयीत या नाटकाचे कथानक समोर सरकते. या समूहनाट्यात पुरुषांच्या भूमिकाही महिलांनीच वठवल्याने या नाटकाची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे.

मराठी साहित्य संमेलनातही मिळाला मान

महाराष्ट्रातील शेतकरी परिवाराचे विदारक चित्र उभे करणाऱ्या ‘तेरवं’ या नाटकाच्या लेखनासाठी लेखक श्याम पेठकर यांना २०२० चा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईने उत्कृष्ट लेखक म्हणून गौरव केला आहे. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान या नाटकात काम करणारी शेतकरी विधवा वैशाली येडे हिला मिळाला होता. दिग्दर्शक हरीष इथापे यांचा मराठी नाटक समूह, मुंबईकडून प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.

 

टॅग्स :Socialसामाजिक