शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं ‘तेरवं’ ‘भारत रंग’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:41 IST

Wardha News आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनाटकातून विधवा पत्नींच्या मांडल्या व्यथा

वर्धा: मर्द शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांच्या विधवा बायका मात्र जगण्याशी दोन हात करीत मर्दानी संघर्ष करतात, हे सारतत्त्व असलेले, आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

श्याम पेठकर लिखित आणि हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची निर्मिती अध्ययन भारती, वर्ध्याच्या ॲग्रो थिएटरने केली आहे. या नाटकाला वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिले आहे. कोरोनापूर्व काळात या नाटकाचे मुंबई विद्यापीठाच्या नाट्यमहोत्सवात, तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर काही ठिकाणी प्रयोग झाले आहेत. पण, नंतर या नाटकाचे प्रयोग बंद पडले. देश आणि विदेशांतील ७७१ नाटकांचा अभ्यास केल्यावर भारतातून विविध प्रांत व भाषांमधील ७७ नाटके निवडण्यात आली. तसेच विदेशी रंगभूमीवरील दहा नाटकांच्या निवडीसह ८७ नाटकांचा समावेश भारत रंग महोत्सवात आहे. देशी नाटकांपैकी ‘तेरवं’ सह चार मराठी नाटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या नाटकात शेतकरी विधवा महिलांनीच काम केले आहे. महिलांचे नाट्य प्रशिक्षण घेऊन त्यातून तेरा महिलांची निवड करण्यात आली. समूह नाट्याच्या शैलीत बसविण्यात आलेल्या या नाटकाचे वैशिष्ट त्याचे संगीत हेच आहे. जात्यावरील ओव्यांच्या लयीत या नाटकाचे कथानक समोर सरकते. या समूहनाट्यात पुरुषांच्या भूमिकाही महिलांनीच वठवल्याने या नाटकाची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे.

मराठी साहित्य संमेलनातही मिळाला मान

महाराष्ट्रातील शेतकरी परिवाराचे विदारक चित्र उभे करणाऱ्या ‘तेरवं’ या नाटकाच्या लेखनासाठी लेखक श्याम पेठकर यांना २०२० चा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईने उत्कृष्ट लेखक म्हणून गौरव केला आहे. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान या नाटकात काम करणारी शेतकरी विधवा वैशाली येडे हिला मिळाला होता. दिग्दर्शक हरीष इथापे यांचा मराठी नाटक समूह, मुंबईकडून प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.

 

टॅग्स :Socialसामाजिक