शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार गावांसाठी अशीही मदत... श्

By admin | Updated: May 16, 2017 01:15 IST

पाणी फाऊंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात असून आर्वी तालुक्यातील ५२ गावे झटत आहेत.

रमदात्यांवर आयुर्वेदोपचार : पंचकर्म उपचारांचाही उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात असून आर्वी तालुक्यातील ५२ गावे झटत आहेत. शारीरिक श्रमाची सवय नसलेले हातही पाणीदार गावांसाठी श्रमदान करीत आहेत. हा उत्साह खंडित होऊ नये म्हणून महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयाने श्रमदात्यांवर आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करीत अभिनव सहकार्य केले.शारीरिक श्रमाची फारसी सवय नसलेली अनेक मंडळी गावांत पोहोचून श्रमदान करीत आहे. स्वयंसेवी कार्यकर्ते व सहभागी ग्रामस्थांनाही या श्रमांमुळे थकवा येतो. हा थकवा दूर व्हावा म्हणून दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित महात्मा गांधी आयुर्वेद रुगणालयाद्वारे आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे. काकडदरा या गावात आयुर्वेद रुग्णालयाच्या पथकाने श्रमदानही केले आणि श्रमदात्यांवर आयुर्वेद व पंचकर्म उपचारही केलेत. ही अभिनव मदत पाहून ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांचा हुरूप आणखीच वाढत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले.या उपक्रमात संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे आणि अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांच्या मार्गदर्शनात डॉ. गौरव सावरकर, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. वाटकर, डॉ. धिरज राजपूत, डॉ. मुजाहिद, डॉ. रवी देशमुख, पदव्युत्तर विद्यार्थी, इटर्न तथा पंचकर्म विभागाच्या १० स्त्री-पुरूष मसाजरनी सहभागी स्वयंसेवकांवर उपचार केलेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देत या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.