शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

By अभिनय खोपडे | Updated: August 25, 2023 17:27 IST

सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादीपासून राख्या तयार केल्या.

वर्धा : शेतीत उत्पादन होणाऱ्या कडधान्य शेतमालापासून विद्यार्थीनींनी राख्या तयार करून भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या हा सोहळा कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी येथे रक्षाबंधनाचे निमित्ताने पार पडला. कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आर्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींनी कडधान्य व शेतमालापासून विशेषत: सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादी उत्पादनापासून सुंदर प्रकारच्या राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांकरिता पाठविल्या.

या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीनी आपला सहभाग नोंदवून जवळपास ५० राख्या तयार केल्या. भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांना आपल्या घरची आठवण नको यायला म्हणून विद्यार्थिनींनी ही अभिनव संकल्पना राबवून या सर्व राख्या त्या जवानांना पाठवून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. सोबतच शेतकऱ्यांच्या मुलींनी शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून राख्या तयार केल्यात त्यामुळे पुन्हा जय जवान, जय किसान ही भावना वाढीस लागण्यास मदत झाली. अशी राखी तयार करणाऱ्या मुलींनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा धर्मेंद्र राऊत,डॉ.भावना खंडाळकर,प्रा.राजेंद्र ढगे, प्रा.हमिद शेख,डॉ.गणेश मस्के,प्रा. मोहन कुंभरे, प्रा.नितीन शिरपूरकर,प्रा.लखन जाधव, प्रा. तनुज काळे,प्रा.प्रगती कोरडे आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकRakhiराखीSoldierसैनिकRaksha Bandhanरक्षाबंधनwardha-acवर्धा