शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

By अभिनय खोपडे | Updated: August 25, 2023 17:27 IST

सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादीपासून राख्या तयार केल्या.

वर्धा : शेतीत उत्पादन होणाऱ्या कडधान्य शेतमालापासून विद्यार्थीनींनी राख्या तयार करून भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या हा सोहळा कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी येथे रक्षाबंधनाचे निमित्ताने पार पडला. कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आर्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींनी कडधान्य व शेतमालापासून विशेषत: सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादी उत्पादनापासून सुंदर प्रकारच्या राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांकरिता पाठविल्या.

या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीनी आपला सहभाग नोंदवून जवळपास ५० राख्या तयार केल्या. भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांना आपल्या घरची आठवण नको यायला म्हणून विद्यार्थिनींनी ही अभिनव संकल्पना राबवून या सर्व राख्या त्या जवानांना पाठवून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. सोबतच शेतकऱ्यांच्या मुलींनी शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून राख्या तयार केल्यात त्यामुळे पुन्हा जय जवान, जय किसान ही भावना वाढीस लागण्यास मदत झाली. अशी राखी तयार करणाऱ्या मुलींनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा धर्मेंद्र राऊत,डॉ.भावना खंडाळकर,प्रा.राजेंद्र ढगे, प्रा.हमिद शेख,डॉ.गणेश मस्के,प्रा. मोहन कुंभरे, प्रा.नितीन शिरपूरकर,प्रा.लखन जाधव, प्रा. तनुज काळे,प्रा.प्रगती कोरडे आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकRakhiराखीSoldierसैनिकRaksha Bandhanरक्षाबंधनwardha-acवर्धा