शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 01:58 IST

सध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते.

रक्कम परत मिळण्याची संधी : वर्धेत सात महिन्यात २३ जणांना ११.८५ लाखांचा गंडा रूपेश खैरी वर्धासध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते. यात अनेकांना लाखोंचा चूना लागतो. अशा आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना आपली रक्कम गेली, ती आता परत मिळणार नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा फसवणुकीत नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईन व्यवहारात झालेल्या फसवणुकीची रक्कम नागरिकांना देण्याची सवलत शासनाच्यावतीनेच दिली आहे. याचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना केवळ सायबर सेलच्या माध्यमातून मंत्रालयात असलेल्या ‘सचिव, माहिती व तंत्रज्ञान संचालक’ यांच्या नावे अर्ज करण्याची गरज आहे. हा अर्ज करताना त्यांना शासनाने या संदर्भात दिलेल्या नियमानुसार काही रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरून केलेल्या अर्जाची तपासणी होवून नागरिकांना चोरट्यांनी लांबविलेली रक्कम मिळण्याची संधी आहे. ही संधी केवळ आॅनलाईन फसगत झालेल्यांकरिताच आहे. ज्या कुणी आमिषाला बळी पडून बॅकेत जात रक्कम भरली त्यांना मात्र या सुविधेचा लाभ होत नाही. या सुविधेची माहिती अनेकांना नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेत गत सात महिन्यात एटीएमच्या माध्यमातून २३ जणांना एकूण ११ लाख ८५ हजार ३५२ रुपयांनी गंडा बसल्याची नोंद आहे. या पैकी दोन गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपये वसूल झाले आहे. यातील एक लाख २५ हजार ७०० रुपये कंपनीकडून वसूल करण्यात आले आहे. यात आतापर्यंत केवळ तिघांनाच अटक केल्याची माहिती आहे. अशा प्रकारात झालेल्या फसवणुकीचा शोध लागणे तसे कठीणच. रक्कम मिळविण्याकरिता रकमेनुसार भरावे लागणारे शुल्कफसवणुकीत गेलेली रक्कम मिळविण्याकरिता नागरिकांना गुन्हा दाखल असलेल्या जिल्ह्याच्या सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज आहे. या अर्जाची किंमत ५० रुपये आहे. हा अर्ज थेट केल्यास कुठलाही लाभ होणार नाही. तो सायबर सेलच्या माध्यमातूनच होणे आवश्यक आहे. शुल्क भरण्याचा नियम १० हजार रुपयांपर्यंत गंडा बसल्यास अर्ज करताना रकमेच्या १० टक्के शुल्क भरावा लागणार आहे.१० ते ५० हजार रुपयापर्यंतच्या नुकसानाकरिता १ हजार रुपयासंह रकमेनुसार ५ टक्के शुल्क भरणे गरजेचे आहे.५० हजार ते १ लाख रुपयांकरिता ३ हजार रुपये आणि रकमेच्या चार टक्के शुल्क तर एक लाखा पेक्षा अधिक रक्कम असल्यास ५ हजार रुपये आणि रकमेच्या दोन टक्के शुल्क भरावे लागतील.माहिती असतानाही फसगत तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला, तुुम्हाला नवा क्रमांक देण्यात येत आहे. असे म्हणत एटीएमचा पासवर्ड विचारून फसवणूक करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अशा घटना घडत असल्याची माहिती नागरिकांना असली तरी अशा थापांना ते बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतात टॉवर उभारण्यासंदर्भात पैशाची मागणी करून लाभ देण्याच्या आमिषाने फसविल्याच्या घटनाही समोर येत आहे. यापासून नागरिकांनी सावधान राहण्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून जनजागृती एटीएमच्या माध्यमातून फसगत झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या, त्याच्या तक्रारीही पोलिसात आहे. त्यांचा तपास लागणे तसे कठीणच. मात्र पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. अशी फासगत होण्यापेक्षा नागरिकांनी सावधागिरी बाळगावी असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम म्हणून एसएमएस पाठविण्यात येत आहेत.