शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत.

ठळक मुद्दे४० घरांची पडझड : अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, नुकसानीच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नजीकच्या रसुलाबाद परिसरात वादळीवाºयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे रसुलाबादसह बाºहा सोनेगाव, साटोडा, टेंभरी परसोडी, पाचोड, विरुळ या गावातील सुमारे ४० घरांची पडझड झाली आहे. यात सदर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून काहींच्या घरावरील टिनपत्रेच उडून गेली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून ढगाळी वातावरण असले तरी दुपारी १२ च्या सुमारास ऊन निकाल्याने अनेकांनी शेतीची वाट धरली. अशातच डोक्यावरील सुर्यनारायण पश्चिमेच्या दिशेने थोडा सरकताच वातावरणात बदल होत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत. पावसादरम्यान सदर नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. माहिती मिळताच रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, ग्रामविकास अधिकारी बोबडे, तलाठी भोले, कोतवाल अरुण हेंडवे, पोलीस पाटील श्याम काकडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वृत्तलिहिस्तोवर नुकसान झालेल्या घरांची आकडेवारी जूळवणे सुरू होते. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.नारा येथे वीज पडून पाच गार्इंचा मृत्यूकारंजा (घा.) - मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान नारा परिसरात वीज पडल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकाचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी जनावर चारण्यासाठी नेण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने जनावरांनी झाडाचा आधार घेतला. पण याच दरम्यान वीज पडल्याने झाडाखाली असलेल्या पाच गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने गुराखी घटनास्थळापासून दूर असल्याने तो थोडक्यात बचावला. वृत्तलिहिस्तोवर नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव कळू शकले नाही.१० शेळ्यांसह ११ कोंबड्या ठारवडनेर - वडनेर नजीकच्या गांगापूर गावात सोमवारी मुसळधार पावसादरम्यान घर कोसळले. यात १० शेळी व ११ कोंबड्या ठार झाल्या. यामुळे पशुपालक शंकर देवराव अलाम यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री वडनेर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान शंकर अलाम यांनी चराई नंतर बकºया बांधलेल्या घराचा काही भाग कोसळला. या घरात कोंबड्याही होत्या. या अपघातात दहा बकऱ्यांसह ११ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे शंकर अलाम यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. 

टॅग्स :Rainपाऊस