शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पाण्यामुळे रस्त्याची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:30 IST

शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देविठोबा चौकातील प्रकार : दुरूस्तीकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेकांना गंभीर दुखापती होत आहे. असे असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.विठोबा चौकाकडून नागपूरकडे जाणाºया अत्यंत गजबजलेला तथा वाहतुकीचा रस्ता शहरात प्रवेश करतो. फीदा हुसैन पेट्रोल पंपकडून विठोबा चौकाकडे येताना प्रस्तूत प्रतिनिधीने खड्ड्यांची प्रत्यक्ष गणनाच केली. यात खड्डे विठोबा चौक ते पेट्रोलपंप दरम्यान रस्त्यावर लहान-मोठे ११३ खड्डे दिसून आले. या रस्त्याची दर्जेदार दुरूस्ती करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषद प्रशासनाने अद्याप दाखविली नाही. शहरातील अनेक नागरिकांनी मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पाऊस आल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून दुचाकी धारकांची फटफजीती होते. खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. विशेषत: महिला व वृद्ध दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावर इतके अधिक खड्डे आहे की, रस्ताच खड्ड्यात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. खड्डे चुकवून चालण्याच्या नादात अपघात होतात. या रस्त्याचे नव्याने बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. असे असले तरी तोपर्यंत तात्पूरती दुरूस्ती करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुरूमावरून वाहने घसरून होत आहेत अपघाततुकडोजी चौक ते विठोबा चौक दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांत मुरूम टाकण्यात आला आहे. यात दगडच अधिक असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. खड्डे भरताना मुरूम पे्रसही करण्यात आलेला नाही. यापुर्वी हेच खड्डे गिट्टीच्या बारीक चुरीने बुजविण्यात आले होते; पण पहिल्याच पावसातच चुरी वाहून गेली. यानंतर थोडी जाड चुरी खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आली; पण ती निरुपयोगी ठरली आहे. खड्डे मात्र जैसे थे झाले आहेत.आता पालिकेने तिसरा प्रयोग म्हणून मुरूम व दगडाने खड्डे बुजविले आहे. त्या मुरूमाच्या दगडांवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. शिवाय रस्त्यांची अवस्था पाहून पालिकेवर रोष व्यक्त करीत आहेत. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.