शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सांडपाणी सोडले जातेय बोर नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:10 IST

लोक प्रतिनिधीच्या पुढाकाराने शासन दरबारात या नगरीचे धार्मिक महत्त्व पटवून देऊन बोररीराच्या सौंदर्यीकरण घाट बांधण्यासाठी अडीच कोटींच्या आसपास निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाट झाल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. घाटाच्या पायथ्याशी गावातील सांडपाणी येते.

ठळक मुद्देकोट्यवधी खर्च करूनही प्रदूषण : जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : विदर्भाची पंढरी तीर्थक्षेत्र घोराड येथील बोर नदीतीराचे रुपडे पालटले असले तरी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या खर्चात बोर घाट दूषितच राहणार आहेपहिल्यांदा विदर्भाच्या पंढरीचे महत्त्व लक्षात घेऊन लोक प्रतिनिधीच्या पुढाकाराने शासन दरबारात या नगरीचे धार्मिक महत्त्व पटवून देऊन बोररीराच्या सौंदर्यीकरण घाट बांधण्यासाठी अडीच कोटींच्या आसपास निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाट झाल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. घाटाच्या पायथ्याशी गावातील सांडपाणी येते. याचा मार्गही बदलाविला नसल्याने नदीचा प्रवाह बंद झाल्यानंतर हे सांडपाणी घाटाच्या ठिकाणी साचणार आहे. यामुळे भाविकांची स्रान करण्याची इच्छा या सांडपाण्यामुळे अधुरी राहण्याची शक्यता आहे.सुरू असलेल्या घाटाच्या बांधकामावर ग्रामस्थ व भाविक समाधान व्यक्त करीत असले तरी सांडपाणी व्यवस्थापन केले नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामात हे काम का करण्यात आले नाही, असा प्रश्न केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आजवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी गावाच्या विकासावर भर दिला; पण नदीचे निर्मळ पात्र दूषित होत असताना याकडे दुर्लक्ष केले. आता तरी सौंदर्यीकरण करीत असताना सांडपाण्याचा मार्ग बदलविला जाईल, असा कयास लावला जात होता; मात्र घोराडकरांनी पाहिलेले स्वप्न सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने दिवास्वप्न ठरले.बोर तीरावर वसलेले हे गाव दोन संतांच्या वास्तव्याने संतभूमीच नव्हे, तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख झाली. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन कायापालट करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले म्हणून ग्रामस्थांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अजून थोडाफार निधी मंजूर करून हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावा. यात नदीपात्रात जाणारे सांडपाणी घाटात न सोडता दूरवर अंतरावर नेण्यासाठी प्रयत्न करावा, सेलूकडून मंदिराकडे येणाºया रस्त्याचे रुंदीकरण करावे व मंदिर सभोवतालच्या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.येथे रामनवमी यात्रा, कार्तिक यात्रा, संत केजाजी व संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव, आषाढी एकादशी यात्रा आदी धार्मिक उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.रूपडे पालटले पण....४बोरतीरावर पुंडलिकाचे मंदिर आहे. याच मंदिरामागे गावातील सांडपाणी सोडलेले आहे. येथेच घाटाचे प्रशस्त असे बांधकाम केले आहे; पण हे सांडपाणी नदीच्या पात्रात साचत असून काही अंतरावर बोर नदीपात्रात हनुमानाचे मंदिर आहे. त्यामुळे सदोदित या ठिकाणी दूषित पाणी संग्रहित होते. कोट्यवधी रुपये खर्च करून बोरतीराचे रुपडे पालटले; पण सांडपाण्याची समस्या कायम आहे. या स्थळाला बोरतीर्थ असे संबोधले जात असून ते पावित्र्य कायम ठेवण्यासाठी या विकास प्रकियेत या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणी