शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:25 IST

आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे५०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानरोगराईचा प्रादुर्भाव कायमच, आर्थिक घडी विस्कटली

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवातीपासून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला अतिवृष्टीने, तर आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यावर्षी निसर्गकोपामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कपाशी तर बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादकांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. अद्याप वरुणराजाची कृपादृष्टी कायम असल्याने सोयाबीन आणि कपाशीसह इतरही पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबरमधील परतीचा पाऊसही दरदिवसालाच धो-धो बरसत असल्याने शेतशिवारात पाणी साचलेले आहे. सोबतच रोगराईनेही डोके वर काढल्याने पिके जळायला लागली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ५०५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज असून प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याचे चित्र आहे.एक हजार हेक्टरवर झाली फळगळजिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या परिसराची ओळख आहे पण, यावर्षी ‘ब्राऊन रॉट’ या बुरशीजन्य रोगाने बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. या तिन्ही तालुक्यातील १ हजार १८७.५० हेक्टरवरील संत्रा, मोसंबीची फळगळ झाली आहे. सध्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.४३ हजार हेक्टरवरील सोयाबीन गेलेसततचा पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे सोयाबीन वाढले पण, झाडाला शेंगांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरविला आहे. सोबतच यलो मोझॅक, चक्रीभुंगा, अळी आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यातील ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

निम्न वर्धाचे बॅक वॉटरही शेतकऱ्यांच्या मुळावरयावर्षी सुरुवातीपासूनच दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील मोठ्या ११ तर लघु व मध्यम २० जलाशये हाऊसफुल्ल झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पही भरला असून या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ३५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ४५४ शेतकरी अडचणीत आले असून त्यांना दरवर्षीच या बॅक वॉटरचा मोठा फटका बसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती