शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

सेवाग्राम हे तीर्थस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:10 AM

आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.

ठळक मुद्देकिरणकुमार : गांधी १५० जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.आम्ही ट्रम्प आणि इमरान खान यांच्या बाबतीत सर्व काही माहिती करुन घेतो. परंतु या महामानवाचे जीवन चरित्र समजून घेत नाही हे दुर्दैव आहे. अहिंसेचा पाठ घेऊन हिंसेवर विजय मिळविला. त्यांचे योगदानाचे मुल्य नाही. गांधी विचार संपूर्ण विश्वाला दिला आहे. सेवाग्राम ही त्यांची कर्मस्थळी असल्याने हे तिर्थक्षेत्र असल्याचे मी मानतो असे प्रतिपादन अभिनेता किरणकुमार यांनी केले.एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने आयोजीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य व एकता संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्याने अग्निहोत्री इंजिनीअरींग कॉलेज, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) वर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी विचार मंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता किरणकुमार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, होते. एकता सेवा भावी मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष व फिल्म निर्माते अजमत खान, अभिनेता आफताब खान, मोहन अग्रवाल, ठाणेदार चंद्रकांत मदने, विनय राजे, अनिल नरेडी व प्राचार्य पडघम व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करतांना पं. अग्निहोत्री म्हणाले, प्रत्येकांनी गांधीजींचे  सिध्दांत आत्मसात करुन त्यांच्या विचारानुसार वाटचाल करावी. अनुभव हेच सिद्ध ज्ञान आहे. जो तत्त्व आणि आदर्श सोबत चालतो तोच पुज्यनीय असतो. चांगले कार्य करणाऱ्यांंचाच सत्कार होतो असे ते म्हणाले.प्रास्ताविक अजमत खान यांनी केले संचालन आणि आभार इमरान राही यांनी मानले. यावेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, माजी पोलीस आयुक्त, चंद्रकांत उदगीरकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. एम. नारंग, कवियत्री आभा पारगावकर, महेश बुधवानी, भारत राठोड, तुकाराम महाराज मुंढे, प्रकाश महाराज फड, संगीता जामगे, जयश्री देशमुख परभणी, प्रा. रफिक शेख,, डॉ. सुनील कुमार, अमरावती, राजाराम जाधव, उद्धवराव खेडेकर, जालना, किरण वाडिया, हिंगणघाट, डॉ. अनिल बेग, वर्धा व साहिस्ता परवीन अयुब खान, यवतमाळ यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे अभिनेता किरण कुमार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता किरणकुमार यांनी बापूकुटीला भेट दिली.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी