शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वरसेवा

By admin | Updated: September 13, 2015 01:59 IST

महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान योजना शिबिर सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ होण्यासाठी वरदान आहे.

रामदास तडस : सुमारे पाच हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वर्धा : महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान योजना शिबिर सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ होण्यासाठी वरदान आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध योजनांचा लाभ जनतेला मिळून त्यांना दिलासा देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. समुद्रपूर तालुक्यात महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन विद्या विकास महाविद्यालय येथील सभागृहात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख उपस्थिती आमदार समीर कुणावार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, तहसीलदार सचिन यादव व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. खासदार तडस म्हणाले, समाधान योजनेमार्फत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचत आहेत. शासन लोकाभिमुख असून जनतेच्या जगण्यामध्ये शासनाची महत्वाची भूमिका आहे. परंतु प्रशासनाला लोकसहभागाची अपेक्षाही आहे. कारण कोणताही विकास लोकसहभागाशिवाय शक्य नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी समाधान शिबिराच्या यशस्वीतेकरिता विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असल्याचे नमूद करून संपूर्ण जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. एकाच छत्राखाली नागरिकांची सर्व कामे होत असल्यामुळे समाधानही व्यक्त केले. आ. कुणावार यांनी लोकांना किरकोळ कामांसाठी हेलपाटे घालावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या शिबिरामार्फत उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रशासनामार्फत पोहचविण्याचा मानस आहे. यानुषंगाने समुद्रपूर व वायगाव गोंड या महसूल मंडळामध्ये सदर शिबिर राबविण्यात आले. भविष्यामध्ये सर्व मंडळनिहाय असा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांसह जनतेचे समाधान झाल्यावरच विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व जनतेने अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी केले. प्रस्ताविकामध्ये अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरातील विविध उपक्रमांबाबत तालुक्यातील सर्व कार्यालयाने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)