शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम परिसरात नियमांची पायमल्ली

By admin | Updated: August 3, 2014 23:32 IST

नजीकच्या पवनार येथील विनोबा आश्रम परिसरात सध्या धाम नदीच्या वाहत्या पात्रामुळे नयनरम्य दृष्य पहावयास मिळते. अनेक पर्यटक, महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांंच्या संगतीने खास करून

वर्धा : नजीकच्या पवनार येथील विनोबा आश्रम परिसरात सध्या धाम नदीच्या वाहत्या पात्रामुळे नयनरम्य दृष्य पहावयास मिळते. अनेक पर्यटक, महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांंच्या संगतीने खास करून पहाटे फिरवयास येतात. इथल्या स्वच्छ आणि सुंदर वातावरणाची भुरळ सर्वांनाच पडत असते. परंतु त्यांच्याकडून आश्रमच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.पवनार येथील धाम नदी पात्रावर महात्मा गांधी आणि विनोबांच्या स्मृती जपलेल्या आहेत. नदीपात्रातील खडकांमध्ये अतिशय सुंदर असे बांधकाम करून या दोन महात्म्यांची स्मृतिस्थळे तयार करण्यात आली आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी छोट्याशा रस्त्याचीही निर्मिती करण्यात आली आहे. सध्या नदीला भरपूर पाणी असल्याने या छोट्या मार्गावरूनही पाणी वहात आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेटी देतात. सकाळी सकाळी फिरायला येत असलेल्यांची संख्याही वाढली असून त्यात मित्रांच्या गृपची संख्या भरमसाठ आहे.पहाटे आश्रमला भेटी देण्यात किंवा निसर्गरम्य परिसरात फिरायला येणे चांगलेच आहे. येथे आलेल्या पर्यटकांनी नियमांना बांधील राहून पर्यटनाचा आस्वाद घावा, तसेच दोन्ही महात्म्यांचे जीवनकार्य समजून घ्यावे यासाठी काही नियम घालून दिले आहेत. सर्वांना ते प्रकर्षाने दिसावे यासाठी दर्शनी भागातच नियमांचा फलक लावला आहे. पण असे असतानाही अनेकांकडून आश्रमच्या नियमांचा भंग होत आहे. समाधी परिसरात वाहने नेऊ नये यासाठी गेट तयार करण्यात आले होते. पण ते तुटल्याने अनेक युवक सकाळच्या वेळात विनोबांच्या समाधीजवळच गाड्या उभ्या करतात. तसेच समाधीवर चढून फोटो काढण्याचे धारिष्ट्यही काही महानग दाखवितात. या सर्व प्रकारामुळे आश्रम प्रतिष्ठानने घालून दिलेल्या नियमांंची पायमल्ली होत असून समाधी स्थळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. बरेच जण या गाड्या धुण्यासाठीही समाधीपर्यंत नेत असल्याचे पहावयास मिलते.त्याचप्रमाणे आश्रम परिसरातच छत्रीच्या आकाराची सुंदर वास्तू बांधण्यात आली आहे. तिथे बसून समोरील नदीपरिसर चांगल्या प्रकारे न्याहाळता येतो. निवांत बसता यावे यासाठीच ही वास्तू निर्माण केली आहे. परंतु या परिसरातही अनेक जण घाण करून ठेवतात. तसेच मद्यपिंच्या पार्ट्याही या जागेवर रात्री रंगत असल्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात. त्यामुळे या स्थळाच्या पावित्र्यासोबतच सौंदर्यही धोक्यात आले आहे. पर्यटकांनी स्वत:वर आत्मसंयम ठेवून पर्यटनाला येणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)