शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

By admin | Updated: March 21, 2017 01:18 IST

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले.

नियमांना बगल : नैसर्गिक पात्र बदलण्याचा धोकावर्धा : जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. शिवाय घाटधारकांनीही नियमांचे पालन करीत रेतीचा उपसा व वाहतूक करावे, असे निर्देश देण्यात आले; पण कुठेही नियमांचे पालन होत नाही. वडगाव (पांडे) घाट क्र. एक येथे नदी पात्रातच वाहनांसाठी रस्त्यांची निर्मिती केली आहे. परिणामी, वर्धा नदीचे पात्रच धोक्यात आले आहे.आठ तालुक्यांमध्ये वर्धा, यशोदा, वणा आदी नदीपात्रातील अनेक रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील वाळू उपस्यासह वाहतुकीकरिता काही नियम देण्यात आले; पण बहुतांश घाटांवर नियमांची पायमल्ली होत आहे. घाटांतून वाळूची वाहतूक करण्याकरिता थेट नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रात रस्ते तयार करून नदीच्या दोन्ही बाजूला रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. रस्त्यांची निर्मिती करताना पात्रातीलच रेतीचा वापर होतो; पण त्यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांमुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडगाव (पांडे) येथील घाट क्र. एक व दोनचे लिलाव झालेत. या घाटांवर जाण्याकरिता वडगाव गावाच्या रस्त्याचा वापर होतो. परिणामी, रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अल्पावधित दुरवस्था होते. सध्या शासनाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; पण रस्त्यावर डांबर कमी आणि आॅईलचे प्रमाणच अधिक दिसते. यामुळे रेतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याचीही अल्पावधीतच वाताहत होणार, असे दिसते. शिवाय नदीपात्रापर्यंत ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर ही वाहने नेली जात आहे. परिणामी, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वडगाव (पांडे) येथे तर खड्डेमय रस्ता समतल करण्यासाठी एक जेसीबीच घाटधारकाने ठेवला आहे. या जेसीबीद्वारे रस्ता समतल केला जातो. यामुळे ग्रामस्थांतूनही ओरड होत नसल्याचे दिसून आले. या प्रकारातून रेती उपसा आणि वाहतुकीच्या नियमांची मात्र धूळधान केली जात असल्याचेच पाहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कालव्याच्या भिंतीवरून होते जड वाहतूकआर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर), वडगाव शिवारात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कालव्याच्या भिंतीवरून केली जात असल्याचे निदर्शनास आले. यात वाळू भरलेले ट्रक तसेच ट्रॅक्टरही कालव्याच्या भिंतीवरूनच धावत असल्याने कालव्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरा पर्यायी रस्ता करण्याऐवजी हा प्रकार सर्रास घडणारा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाराही ठरत आहे.वाहने फसून होतात अपघातनदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याने जड वाहने थेट पात्रात शिरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रेती भरल्यानंतर वाहने काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे करीत असताना अनेकदा ट्रॅक्टर फसतात. परिणामी, अपघातांना सामोरे जावे लागते. निमगव्हाण घाटावर असा अपघात झाला. तत्पूर्वी एका घाटात पोकलॅण्ड पात्रात बुडाला. या घटनांमुळे चालक, मजुरांना जीव गमवावा लागतो. असाच रेती भरलेला ट्रॅक्टर वडगाव एकमध्ये पात्रात फसून असल्याचे दिसून आले.