शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

By admin | Updated: March 21, 2017 01:18 IST

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले.

नियमांना बगल : नैसर्गिक पात्र बदलण्याचा धोकावर्धा : जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. शिवाय घाटधारकांनीही नियमांचे पालन करीत रेतीचा उपसा व वाहतूक करावे, असे निर्देश देण्यात आले; पण कुठेही नियमांचे पालन होत नाही. वडगाव (पांडे) घाट क्र. एक येथे नदी पात्रातच वाहनांसाठी रस्त्यांची निर्मिती केली आहे. परिणामी, वर्धा नदीचे पात्रच धोक्यात आले आहे.आठ तालुक्यांमध्ये वर्धा, यशोदा, वणा आदी नदीपात्रातील अनेक रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील वाळू उपस्यासह वाहतुकीकरिता काही नियम देण्यात आले; पण बहुतांश घाटांवर नियमांची पायमल्ली होत आहे. घाटांतून वाळूची वाहतूक करण्याकरिता थेट नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रात रस्ते तयार करून नदीच्या दोन्ही बाजूला रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. रस्त्यांची निर्मिती करताना पात्रातीलच रेतीचा वापर होतो; पण त्यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांमुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडगाव (पांडे) येथील घाट क्र. एक व दोनचे लिलाव झालेत. या घाटांवर जाण्याकरिता वडगाव गावाच्या रस्त्याचा वापर होतो. परिणामी, रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अल्पावधित दुरवस्था होते. सध्या शासनाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; पण रस्त्यावर डांबर कमी आणि आॅईलचे प्रमाणच अधिक दिसते. यामुळे रेतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याचीही अल्पावधीतच वाताहत होणार, असे दिसते. शिवाय नदीपात्रापर्यंत ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर ही वाहने नेली जात आहे. परिणामी, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वडगाव (पांडे) येथे तर खड्डेमय रस्ता समतल करण्यासाठी एक जेसीबीच घाटधारकाने ठेवला आहे. या जेसीबीद्वारे रस्ता समतल केला जातो. यामुळे ग्रामस्थांतूनही ओरड होत नसल्याचे दिसून आले. या प्रकारातून रेती उपसा आणि वाहतुकीच्या नियमांची मात्र धूळधान केली जात असल्याचेच पाहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कालव्याच्या भिंतीवरून होते जड वाहतूकआर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर), वडगाव शिवारात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कालव्याच्या भिंतीवरून केली जात असल्याचे निदर्शनास आले. यात वाळू भरलेले ट्रक तसेच ट्रॅक्टरही कालव्याच्या भिंतीवरूनच धावत असल्याने कालव्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरा पर्यायी रस्ता करण्याऐवजी हा प्रकार सर्रास घडणारा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाराही ठरत आहे.वाहने फसून होतात अपघातनदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याने जड वाहने थेट पात्रात शिरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रेती भरल्यानंतर वाहने काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे करीत असताना अनेकदा ट्रॅक्टर फसतात. परिणामी, अपघातांना सामोरे जावे लागते. निमगव्हाण घाटावर असा अपघात झाला. तत्पूर्वी एका घाटात पोकलॅण्ड पात्रात बुडाला. या घटनांमुळे चालक, मजुरांना जीव गमवावा लागतो. असाच रेती भरलेला ट्रॅक्टर वडगाव एकमध्ये पात्रात फसून असल्याचे दिसून आले.