शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

By admin | Updated: March 21, 2017 01:18 IST

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले.

नियमांना बगल : नैसर्गिक पात्र बदलण्याचा धोकावर्धा : जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. शिवाय घाटधारकांनीही नियमांचे पालन करीत रेतीचा उपसा व वाहतूक करावे, असे निर्देश देण्यात आले; पण कुठेही नियमांचे पालन होत नाही. वडगाव (पांडे) घाट क्र. एक येथे नदी पात्रातच वाहनांसाठी रस्त्यांची निर्मिती केली आहे. परिणामी, वर्धा नदीचे पात्रच धोक्यात आले आहे.आठ तालुक्यांमध्ये वर्धा, यशोदा, वणा आदी नदीपात्रातील अनेक रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील वाळू उपस्यासह वाहतुकीकरिता काही नियम देण्यात आले; पण बहुतांश घाटांवर नियमांची पायमल्ली होत आहे. घाटांतून वाळूची वाहतूक करण्याकरिता थेट नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रात रस्ते तयार करून नदीच्या दोन्ही बाजूला रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. रस्त्यांची निर्मिती करताना पात्रातीलच रेतीचा वापर होतो; पण त्यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांमुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडगाव (पांडे) येथील घाट क्र. एक व दोनचे लिलाव झालेत. या घाटांवर जाण्याकरिता वडगाव गावाच्या रस्त्याचा वापर होतो. परिणामी, रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अल्पावधित दुरवस्था होते. सध्या शासनाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; पण रस्त्यावर डांबर कमी आणि आॅईलचे प्रमाणच अधिक दिसते. यामुळे रेतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याचीही अल्पावधीतच वाताहत होणार, असे दिसते. शिवाय नदीपात्रापर्यंत ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर ही वाहने नेली जात आहे. परिणामी, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वडगाव (पांडे) येथे तर खड्डेमय रस्ता समतल करण्यासाठी एक जेसीबीच घाटधारकाने ठेवला आहे. या जेसीबीद्वारे रस्ता समतल केला जातो. यामुळे ग्रामस्थांतूनही ओरड होत नसल्याचे दिसून आले. या प्रकारातून रेती उपसा आणि वाहतुकीच्या नियमांची मात्र धूळधान केली जात असल्याचेच पाहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कालव्याच्या भिंतीवरून होते जड वाहतूकआर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर), वडगाव शिवारात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कालव्याच्या भिंतीवरून केली जात असल्याचे निदर्शनास आले. यात वाळू भरलेले ट्रक तसेच ट्रॅक्टरही कालव्याच्या भिंतीवरूनच धावत असल्याने कालव्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरा पर्यायी रस्ता करण्याऐवजी हा प्रकार सर्रास घडणारा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाराही ठरत आहे.वाहने फसून होतात अपघातनदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याने जड वाहने थेट पात्रात शिरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रेती भरल्यानंतर वाहने काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे करीत असताना अनेकदा ट्रॅक्टर फसतात. परिणामी, अपघातांना सामोरे जावे लागते. निमगव्हाण घाटावर असा अपघात झाला. तत्पूर्वी एका घाटात पोकलॅण्ड पात्रात बुडाला. या घटनांमुळे चालक, मजुरांना जीव गमवावा लागतो. असाच रेती भरलेला ट्रॅक्टर वडगाव एकमध्ये पात्रात फसून असल्याचे दिसून आले.