शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

सर्वदूर रिमझिम पाऊसधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.

ठळक मुद्दे१४.८२ मिमी पाऊस : निम्न वर्धा प्रकल्पाची दो दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारीही सकाळपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली. यामध्ये जिल्ह्याभरातील आठही तालुक्यामध्ये सरासरी १४.८२ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसाने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ७३.७१ टक्के भरल्याने या प्रकल्पाची दोन गेट १० से.मी. उघडल्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.सध्या सर्वत्रच समाधान कारक पाऊस असल्याने पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसधारांनी दुपारी तीन वाजताच उसंत घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले. सततच्या पावसामुळे बऱ्याच भागातील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. आकाशात ढगांची गर्दी कायम असून दमदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.सध्या जिल्ह्यातील ११ मोठ्या जलाशयापैकी पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्प तसेच २० लघू व मध्यम जलाशयांपैकी आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी व रोठा दोन या सहाही जलाशयाच्या सांडव्यावरुण पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौदर्य बघण्यासाठी या कोरोनाकाळात त्रस्त झालेल्या नागरिकांची गर्दी उसळत आहे. काही पोहोण्याचाही आनंद लुटत आहे पण, त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.लघु, मध्यम जलाशयांची पाणीपातळी वाढलीजिल्ह्यातील २० लघू व मध्यम जलाशय असून पावसामुळे पाणीपातळीत चागलीच वाढ झाली आहे. आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२ व परसोडी ही जलाशये ९० टक्के पेक्षा अधिक भरलेली आहेत. तर लहादेवी, रोठा-१ व कन्नमवारग्राम या तीन जलाशातील पाणीपातळी ८० टक्के पेक्षा जास्त असून कवाडी, सावंगी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, कुऱ्हा, आष्टी, पिलापूर, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या जलाशयातील पाणी पातळी ८० टक्केच्या आत आहे.

टॅग्स :Rainपाऊस