शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटाकडे

By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST

शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात करण्यात आली आहे. अन्न बनविण्यापासून बाकी जबाबदारी आता बचत ..

 सेवाग्राम : शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात करण्यात आली आहे. अन्न बनविण्यापासून बाकी जबाबदारी आता बचत गटांची असणार असणार आहे . या निर्णयाने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला असून याची अंमलबजावणी नव्या सत्रांपासून होणार आहे. या निर्णयाचे पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, सकस आहार मिळावा या उद्देशाने या योजनेचा प्रारंभ शासनाने केला. या योजनेच्या अंमलबजावनीची जबाबदारी मुख्याध्यापकावर असल्याने कामाचा तणाव वाढला अशी तक्रार करण्यात येत होती. कालांतराने तक्रारी वाढल्या, मुख्याध्यापक संघाने याला विरोध केला. यावर शासनाने चर्चा करुन हा निर्णय घेतला. यामुळे मुख्याध्यापक तणावमुक्त झाले असले तरी पण काही प्रमाणात जबाबदारी मात्र मुख्याध्यापकांकडे असणार आहे. बचत गटांना जबाबदारी देतांना काही निकष ठेवण्यात आले आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घ्यावा. बचत गट हा नोंदणीकृत असला पाहिजे, याची निवड समितीला करावी लागेल. यासाठी करारनामा बचत गटाकडून करावा लागणार आहे. पत्रामध्ये आतापर्यंत काम करणार्‍या स्वयंपाकीन, मदतनीस यांना संरक्षण देण्यात आले आहे. तशी अट बचत गटांसमोर ठेवण्यात येणार आहे. येणार्‍या मालाची नोंदणी, माल सांभाळून ठेवणे, मागणी, जबाबदारी, हिशेब, मुलांच्या नोंदी, मेनू ही सर्व कामे आता गटांना करावी लागेल. या सर्व कामावर नियंत्रण मुख्याध्यापकाचे राहणार तसा अहवाल तपासने मुख्याध्यापकांना बंधनकारक राहिल. यात दोष आढळून आल्यास कारवाईची शिफारस मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडे करण्यात येईल असे पत्रकांत नमूद आहे. पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकच सांभाळत. त्यांना काही शिक्षक मदत करीत असे, पण नव्या पत्रकाप्रमाणे सर्व शिक्षकांनी काम वाटून घ्यायची आहे. जेणे करुन शिजवण्याची यंत्रणा व्यवस्थीत कार्य करेल. आहाराची चव सर्वप्रथम स्वयंपाकी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक घेऊन नोंदवहित नोंद करतील. नंतरच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. आहे. २०१४-१५ या शालेय सत्रापासून याची जबाबदारी बचत गटांकडे जाणार आहे. यामुळे मुख्याध्यापकांना टेंशन फ्री वाटणार यात शंका नाही.(वार्ताहर)