शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटाकडे

By admin | Updated: May 10, 2014 00:26 IST

शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात करण्यात आली आहे. अन्न बनविण्यापासून बाकी जबाबदारी आता बचत ..

 सेवाग्राम : शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात करण्यात आली आहे. अन्न बनविण्यापासून बाकी जबाबदारी आता बचत गटांची असणार असणार आहे . या निर्णयाने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला असून याची अंमलबजावणी नव्या सत्रांपासून होणार आहे. या निर्णयाचे पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, सकस आहार मिळावा या उद्देशाने या योजनेचा प्रारंभ शासनाने केला. या योजनेच्या अंमलबजावनीची जबाबदारी मुख्याध्यापकावर असल्याने कामाचा तणाव वाढला अशी तक्रार करण्यात येत होती. कालांतराने तक्रारी वाढल्या, मुख्याध्यापक संघाने याला विरोध केला. यावर शासनाने चर्चा करुन हा निर्णय घेतला. यामुळे मुख्याध्यापक तणावमुक्त झाले असले तरी पण काही प्रमाणात जबाबदारी मात्र मुख्याध्यापकांकडे असणार आहे. बचत गटांना जबाबदारी देतांना काही निकष ठेवण्यात आले आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घ्यावा. बचत गट हा नोंदणीकृत असला पाहिजे, याची निवड समितीला करावी लागेल. यासाठी करारनामा बचत गटाकडून करावा लागणार आहे. पत्रामध्ये आतापर्यंत काम करणार्‍या स्वयंपाकीन, मदतनीस यांना संरक्षण देण्यात आले आहे. तशी अट बचत गटांसमोर ठेवण्यात येणार आहे. येणार्‍या मालाची नोंदणी, माल सांभाळून ठेवणे, मागणी, जबाबदारी, हिशेब, मुलांच्या नोंदी, मेनू ही सर्व कामे आता गटांना करावी लागेल. या सर्व कामावर नियंत्रण मुख्याध्यापकाचे राहणार तसा अहवाल तपासने मुख्याध्यापकांना बंधनकारक राहिल. यात दोष आढळून आल्यास कारवाईची शिफारस मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडे करण्यात येईल असे पत्रकांत नमूद आहे. पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकच सांभाळत. त्यांना काही शिक्षक मदत करीत असे, पण नव्या पत्रकाप्रमाणे सर्व शिक्षकांनी काम वाटून घ्यायची आहे. जेणे करुन शिजवण्याची यंत्रणा व्यवस्थीत कार्य करेल. आहाराची चव सर्वप्रथम स्वयंपाकी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक घेऊन नोंदवहित नोंद करतील. नंतरच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. आहे. २०१४-१५ या शालेय सत्रापासून याची जबाबदारी बचत गटांकडे जाणार आहे. यामुळे मुख्याध्यापकांना टेंशन फ्री वाटणार यात शंका नाही.(वार्ताहर)