शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खत देण्यास महिला मजुरांकडून दिला जातोय नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM

हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देमुला-मुलींनी खत द्यायचा मोर्चा सांभाळला : मजुरी २०० रूपये प्रतिबॅग, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दिवसागणिक शेतीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. यातच सततची नापिकी आणि अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जगणेच अवघड झाले आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात कपाशी पिकांची चिकणीसह परिसरातील शेतशिवारात लागवड करण्यात आली. कपाशीचे बियाणे अंकुरले असून रोपटे जमिनीच्या वर आलेत. यामुळे डवरणी सह खत देण्याच्या कामाला वेग दिला जात आहे.शुक्रवारी व मंगळवारला चिकणीसह पढेगाव, जामणी, निमगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकरी कपाशी पिकाला खत द्यायच्या कामाला गती देत आहेत. मात्र, महिला मजूर खत द्यायच्या कामाला नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.खत द्यायच्या कामाला महिला मजूर नकार देत असल्यामुळे ना इलाजास्तव मुलांना बॅग प्रमाणे खत द्यायला सांगावे लागते. विशेष म्हणजे शेतीच्या कामात वेळेला फार महत्व असते. वेळेचे काम वेळीच करावे लागते. तरच शेतीत उत्पन्न होण्याची शक्यता असते.- अतुल घोडे, युवा शेतकरी, चिकणी.शेतीची कामे आली ठेकापद्धतीवरपुर्वी शेतीची सर्रास कामे ही रोजनदारीनेच केल्या जायची. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असायचा. पण गेल्या चार-पाच वर्षामध्ये शेतीकामे ही घडाळीच्या तासाप्रमाणे झाले आहेत. तर काही कामे ठेक्याप्रमाणे. खत देणे बॅग प्रमाणे, औषध फवारणी पंपा प्रमाणे, तर निंदन तासाप्रमाणे, निंदन करणाऱ्या मजुरांचे तास या प्रमाणे असतात. सकाळी ७ ते ९, ८ ते ९, १० ते ३, ११ ते ५ असे ठरले असते.

टॅग्स :agricultureशेती