शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे योग्य नियोजन करा

By admin | Updated: May 19, 2016 01:48 IST

जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, ..

शैलेश नवाल : जिल्हास्तरीय सल्लागार आढावा बैठकवर्धा : जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने सर्व बँकांनी नियोजन करावे. त्यासाठी मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करावी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मॉन्सूनपूर्व हंगाम लक्षात घेऊन ३० मेपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सूचना नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड, सर्व बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले की, मागील वर्षी सर्व बँकांनी चांगले काम केले. आता आपल्याला त्यापेक्षाही जोमाने काम करून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ द्यावयाचा आहे. यासाठी लवकरच मंडळस्तरावर कर्ज मेळावे घेऊन पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनाही मॉन्सून पूर्व हंगामात कर्ज उपलब्ध द्यावयाचे आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून ३१ मे पर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिलेली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांना कर्ज व अन्य शेतीविषयक कामांकरिता हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गतवर्षीच्या कर्ज वाटपाचा आढावाही घेण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)७५ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप२०१६-१७ अंतर्गत खरीपासाठी जिल्ह्यातील ६ हजार ७०० खातेदारांना सर्व बॅँकांनी मिळून ७५ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती प्रारंभी जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा यांनी दिली. शिवाय मे २०१६ पर्यंत उर्वरित पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम यांनीही पीक कर्जाबाबत माहिती दिली. पुढील बैठकीत गावनिहाय बॅँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व बॅँकांनी त्या पुरवित असलेल्या सेवा क्षेत्रातील खातेदारांच्या माहितीसह उपस्थित राहावे. येणाऱ्या अडचणींबाबत अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन अवगत करावे. केवळ उद्दीष्टावर आधारीत कामगिरी पार न पाडता उद्दीष्टाबाहेर जाऊन सामाजिक हिताच्या दृष्टीने पीक कर्जास पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.