शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात पिंपळगाव अव्वल

By admin | Updated: May 18, 2017 00:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आलेत.

५१३ पैकी २८२ ग्रा.पं. चा स्पर्धेत सहभाग : निकष पूर्ण करणाऱ्या ग्रा.पं.चे केले गुणांकन प्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. यात वर्धा जिल्ह्यात पिंपळगाव (वडाळा) ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. पिंपळगावने सर्वाधिक ९३ गुण प्राप्त केले. द्वितीय पुरस्कार पिलापूर तर तृतीय पुरस्कार जामणी ग्रा.पं. ने पटकाविला आहे. जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त व्हावे, गावातील घाणीचे साम्राज्य दूर व्हावे, गाव निर्मल व्हावे याकरिता शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील ५१३ पैकी २८२ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील १९ गावे सर्वेक्षणात गुण तालिकेत बसली असून तीन गावांना प्रथम, द्वितीय तृतीय तर तीन गावांना विशेष पुरस्कार देण्यात आलेत. ग्रामस्वच्छतेचा प्रथम पुरस्कार आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (वडाळा) या गावाने पटकावला आहे. शौचालय व सांडपाणी व्यवस्थापनात या ग्रा.पं. ने गुण प्राप्त केलेत. १ मे ते ३० नोव्हेंबर दरम्यान या ग्रा.पं. द्वारे विविध उपक्रम राबविण्यात आलेत. या उपक्रमांमुळेही पिंपळगावला अतिरिक्त गुणांची कमाई करता आली आहे. परिणामी, ९३ गुण घेत या गावाला प्रथम पुरस्कार प्राप्त करता आला. द्वितीय पुरस्कार आष्टी तालुक्यातील पिलापूर ग्रा.पं. ने ९० गुण घेत पटकाविला. तृतीय पुरस्कार सेलू तालुक्यातील जामणी ग्रा.पं. ने ८६ गुण घेत प्राप्त केला. शिवाय ग्रामस्वच्छता अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात स्व. वसंतराव नाईक विशेष पुरस्कार सेलू तालुक्यातील आकोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर तर स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार देवळी तालुक्यातील पडेगाव ग्रा.पं. ला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे गावांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सहा गावांना १०.७५ लाखांचे पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कृत करण्यात येणार आहे. यातील प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, द्वितीय तीन लाख रुपये तर तृतीय दोन लाख रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय विशेष पुरस्कारांमध्ये तीन ग्रामपंचातींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पात्रतेसाठी हे होते निकष पुरस्कारास पात्र ठरण्यासाठी ग्रा.पं. ना काही निकष दिले होते. यात शौचालय व्यवस्थापन ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापन १० गुण, घनकचरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन २० गुण, घर, गाव परिसर स्वच्छता ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५, स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ५ गुण व लोहसहभाग, सामूहिक स्वयंपुढाकारातून उपक्रमावर १० गुण, असे १०० गुण होते.