शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 9:32 PM

एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपावणेदोन कोटींच्या नळयोजनेनंतरही परिस्थिती गंभीर

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा करणे हे मागील नऊ वर्षांपासून सूरू आहे.तालुक्यात प्रथम नळयोजना घोराड गावात तत्कालीन सरपंच शंकरराव खोपडे यांनी आणली. या नळयोजनेचे काम १९७४ साली पूर्ण झाले. शिवाय तत्कालीन पालकमंत्री प्रभा राव यांच्या उपस्थितीत १९७५ ला या नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी दोन सार्वजनिक विहिरीवरून उचल केलेले पाणी एका जलकुंभात साठविले जात होते. शिवाय याच पाण्याचा पुरवठा गावातील दिवसातून दोन वेळा केल्या जात होता. तब्बल ३५ वर्षानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यास जात असलेली अडचण पाहता नवीन नळयोजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा झेंडी मिळाला. २०१६-१७ या वर्षात पावणे दोन कोटींची नळ योजना कार्यान्वित होवून नवसंजीवनी मिळाली. नव्याने पाईप लाईन, दोन नवीन जलकुंभ आणि एका विहिरीची यात भर पडली.तसेच नळावर मिटर लाऊन २४ तास पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली; पण जुनीच परिस्थिती कायम राहिली. पावणे दोन कोटी खुर्चनही घोरडवासियांना दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण कायम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवणूक कशी करावी हा प्रश्न भेडसावत आहे.४० वर्षे जुन्या जलकुंभाचा आधारसहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन नळयोजना कार्यान्वित झाली. यात दोन नव्याने जलकुंभ बांधण्यात आले. मात्र, नवीन नळयोजना मंजूर करताना ४० वर्ष जुन्या जलकुंभ जिर्ण झाल्याची बाब समोर करण्यात आली होती. जि.प. पाणी पुरवठा विभाग आजही जिर्ण जलकुंभातून पाणी पुरवठा करण्यास मंजूरी देत आहे. याचा अर्थ जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना तीन जलकुंभाची आखणी का केली नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.गावात २४ हातपंपासह पाणी पुरवठ्याच्या सात विहिरीघोराडमध्ये २४ हातपंप, पाणी पुरवठा करू शकणाऱ्या ७ विहिरी आहेत. जवळपास ११५० नळ जोडणी आहे. या सर्व विहिरी नळ योजनेला जोडल्यास ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करणे सहज शक्यत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई