शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

एसटीच्या वर्धा विभागाला दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : सात दिवसांपासून फिरलीच नाहीत चाके

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला तब्बल दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी अर्थात एसटीची चाकेही २२ मार्चपासून फिरलीच नाहीत.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. संपूर्ण विभागात एकूण २६७ बसगाड्या आहेत. लग्नसराईचा काळ महामंडळाकरिता सुगीचा असतो. मात्र, यावेळी कोरोनाने सर्वत्र कहर केल्याने लग्नसोहळे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांनाही जबर फटका बसला आहे.शासनाच्या आदेशावरून गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केली आहे. जिल्ह्याच्या सीमाही सिल करण्यात आल्या असून खासगी आणि सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वर्धा विभागांतर्गत पाचही आगारातून औरंगाबाद, नाशिक, पुणे, शिर्डी, नांदेड आदी लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात दररोज शेकडोवर बसफेºया सोडल्या जातात. वर्धा विभागाचे दररोजचे सरासरी उत्पन्न २० लाख रुपये इतके आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत बसफेºया मागील सात दिवसांपासून १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.या सात दिवसांच्या काळात महामंडळाच्या केवळ वर्धा विभागाला वाहतूक उत्पन्नापोटी दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती तशीही फारशी चांगली नसून पूर्वीच तोट्यात आहे. कोरोना संकटाने महामंडळाच्या तोट्यात मात्र, आणखी भर घातली आहे.वर्धा विभागात २६७ बसगाड्यावर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत) आणि पुलगाव असे एकूण पाच आगार आहेत. चारही आगार मिळून एकूण २६७ बसगाड्या आहेत. यात लांब पल्ल्यावर धावणाºया चार अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे या सर्व बसगाड्या सद्यस्थितीत त्या त्या-त्या आगारात उभ्या आहेत.कोरोनाचा विषाणूला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत मागील सात दिवसांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिलपर्यंत महामंडळही लॉकडाऊन असणार आहे. हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता असून विभागांतर्गतच्या आगारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.चेतन हसबनीसविभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा

टॅग्स :state transportएसटी