शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'हिंदू दहशतवाद' शब्द काँग्रेसने आणला, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:00 IST

काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला.

वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजपा आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला. गेल्या हजारो वर्षांत हिंदूच्या दहशतवादीसंबंधी कोणती घटना घडली आहे का? इंग्रज इतिहासकारांनी सुद्धा असे केले नाही. आपल्या 5000 वर्षे जुन्या सभ्यतेला कलंक कोणी लावला? अशा काँग्रेसला आपण माफ करणार का? असे सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रसचे नते सुशील कुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' शब्द आणला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच कोर्टाचा निकाल आला आणि या निकालामुळे काँग्रेसच्या कटाचे सत्य देशासमोर आले. काँग्रेसकडून स्वच्छचा दूताचा अपमान करण्यात आला. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

याचबरोबर, स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावरून काँग्रेसचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक घाबरले आहेत. त्यामुळे याठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला. 

याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाना साधत शरद पवार कुटुंबात अंतर्गत कलह असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत.'  तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, 'विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.'

ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस