शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

मोदी सरकारने अन्नदात्यासह शेतमजुराचाही विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM

सेवाग्राम येथे तीन दिवशीय किसान संमेलनाच्या द्वितीय सत्रात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उमेश तिवारी, विजय पांडा, विनोद सिंग, डॉ. बालाजी कोंपालकर यांची उपस्थिती होती. जावंधिया पुढे म्हणाले, गतवर्षी कापूस उत्पादक शेतकºयांनी ६,२०० रुपये दराने कापूस विकला. मात्र, यंदा केवळ ५,७६० रुपये हमीभाव कापसाला देण्यात आला.

ठळक मुद्देविजय जावंधिया : सेवाग्राम येथील राष्ट्रीय किसान संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी खादीच्या भाववाढ व सूतकताई करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ करताना खºया अर्थाने घाम गाळणाऱ्या सूतकताई करणाऱ्यांचा विचार केला. परंतु, सध्या केंद्रातील मोदी सरकार शेतकरी व शेतमजुरांचे उत्पन्न कसे वाढेल या विषयी विचार करताना दिसत नाही. २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग येणार आहे. त्यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कमीत कमी ४५ हजार रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे. पण त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला बºयापैकी भाव आणि मजुरांना कमीत कमी १ हजार रुपये रोज मिळाला पाहिजे. केंद्र सरकारने देशातील अन्नदात्यासह शेतमजुरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास ही राष्ट्रपित्याला खरी श्रद्धांजली ठरेल. शिवाय तशी मागणी या संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वांनी करावी, असे आवाहन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.सेवाग्राम येथे तीन दिवशीय किसान संमेलनाच्या द्वितीय सत्रात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उमेश तिवारी, विजय पांडा, विनोद सिंग, डॉ. बालाजी कोंपालकर यांची उपस्थिती होती. जावंधिया पुढे म्हणाले, गतवर्षी कापूस उत्पादक शेतकºयांनी ६,२०० रुपये दराने कापूस विकला. मात्र, यंदा केवळ ५,७६० रुपये हमीभाव कापसाला देण्यात आला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस मोदी सरकारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अशी परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. शिवाय पाच ट्रिडियनची अर्थव्यवस्था करण्याचे मोदी सरकार सांगत आहे. परंतु, शेतमजुराच्या मजुरीत वाढ झालेली नाही. पाच वर्षात शेतमजुराची मजुरी किती वाढली हेही अस्पष्ट आहे. शिवाय मनरेगाची मजुरी वाढलेली नाही. शेतकरी आणि शेतमजुराला आपण एकच समजत असल्याने त्या अनुषंगाने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. सदर पत्र कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठविण्यात आले असल्याचे त्या पत्रावर आपणाला उत्तर आले आहे. मनरेगाची मजुरी वाढविली पाहिजे असे अनेकांकडून म्हटले जात आहे. मी स्वत:ला हारलेला शेतकरी नेता समजतो. मजुरीवाढीला आपण सर्वांनी समर्थन केले पाहिजे, असे यावेळी जावंधिया यांनी सांगितले. डब्लू.टी.ओ. वर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. शिवाय सबसिडी विषयीही बोलत नाही. खरे म्हणजे डब्लू. टी. ओ. ने भारतीय शेतकऱ्यांना २५ वर्ष लुटले आहे. पाचव्या वेतन आयोगात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कमीत कमी २,५५०, सहाव्या वेतन आयोगात ७ हजार, सातव्या वेतन आयोगात कमीत कमी प्रतिमहा वेतन १८ हजार रुपये देण्याचे निश्चित करीत हे वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. २०३० मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग येणार आहे. त्यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला प्रतिदिन १,५०० रुपये मोबदला मिळणार आहे. मात्र, शेतकरी व शेतमजुरांचे काय. त्यांनाही कमीत कमी १ हजार रुपये रोज मिळाला पाहिजे. शिवाय त्यावेळी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालांना काय हमी भाव देण्यात येईल याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सदर विषय घेत त्यावर बोलावे, असेही यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सांगितले. संचालन मध्य प्रदेश येथील शेतकरी नेते इरफान जाफरी यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी