शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने अन्नदात्यासह शेतमजुराचाही विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

सेवाग्राम येथे तीन दिवशीय किसान संमेलनाच्या द्वितीय सत्रात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उमेश तिवारी, विजय पांडा, विनोद सिंग, डॉ. बालाजी कोंपालकर यांची उपस्थिती होती. जावंधिया पुढे म्हणाले, गतवर्षी कापूस उत्पादक शेतकºयांनी ६,२०० रुपये दराने कापूस विकला. मात्र, यंदा केवळ ५,७६० रुपये हमीभाव कापसाला देण्यात आला.

ठळक मुद्देविजय जावंधिया : सेवाग्राम येथील राष्ट्रीय किसान संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी खादीच्या भाववाढ व सूतकताई करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ करताना खºया अर्थाने घाम गाळणाऱ्या सूतकताई करणाऱ्यांचा विचार केला. परंतु, सध्या केंद्रातील मोदी सरकार शेतकरी व शेतमजुरांचे उत्पन्न कसे वाढेल या विषयी विचार करताना दिसत नाही. २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग येणार आहे. त्यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कमीत कमी ४५ हजार रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे. पण त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला बºयापैकी भाव आणि मजुरांना कमीत कमी १ हजार रुपये रोज मिळाला पाहिजे. केंद्र सरकारने देशातील अन्नदात्यासह शेतमजुरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास ही राष्ट्रपित्याला खरी श्रद्धांजली ठरेल. शिवाय तशी मागणी या संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वांनी करावी, असे आवाहन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.सेवाग्राम येथे तीन दिवशीय किसान संमेलनाच्या द्वितीय सत्रात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उमेश तिवारी, विजय पांडा, विनोद सिंग, डॉ. बालाजी कोंपालकर यांची उपस्थिती होती. जावंधिया पुढे म्हणाले, गतवर्षी कापूस उत्पादक शेतकºयांनी ६,२०० रुपये दराने कापूस विकला. मात्र, यंदा केवळ ५,७६० रुपये हमीभाव कापसाला देण्यात आला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस मोदी सरकारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अशी परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. शिवाय पाच ट्रिडियनची अर्थव्यवस्था करण्याचे मोदी सरकार सांगत आहे. परंतु, शेतमजुराच्या मजुरीत वाढ झालेली नाही. पाच वर्षात शेतमजुराची मजुरी किती वाढली हेही अस्पष्ट आहे. शिवाय मनरेगाची मजुरी वाढलेली नाही. शेतकरी आणि शेतमजुराला आपण एकच समजत असल्याने त्या अनुषंगाने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. सदर पत्र कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठविण्यात आले असल्याचे त्या पत्रावर आपणाला उत्तर आले आहे. मनरेगाची मजुरी वाढविली पाहिजे असे अनेकांकडून म्हटले जात आहे. मी स्वत:ला हारलेला शेतकरी नेता समजतो. मजुरीवाढीला आपण सर्वांनी समर्थन केले पाहिजे, असे यावेळी जावंधिया यांनी सांगितले. डब्लू.टी.ओ. वर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. शिवाय सबसिडी विषयीही बोलत नाही. खरे म्हणजे डब्लू. टी. ओ. ने भारतीय शेतकऱ्यांना २५ वर्ष लुटले आहे. पाचव्या वेतन आयोगात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कमीत कमी २,५५०, सहाव्या वेतन आयोगात ७ हजार, सातव्या वेतन आयोगात कमीत कमी प्रतिमहा वेतन १८ हजार रुपये देण्याचे निश्चित करीत हे वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. २०३० मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग येणार आहे. त्यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला प्रतिदिन १,५०० रुपये मोबदला मिळणार आहे. मात्र, शेतकरी व शेतमजुरांचे काय. त्यांनाही कमीत कमी १ हजार रुपये रोज मिळाला पाहिजे. शिवाय त्यावेळी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालांना काय हमी भाव देण्यात येईल याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सदर विषय घेत त्यावर बोलावे, असेही यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सांगितले. संचालन मध्य प्रदेश येथील शेतकरी नेते इरफान जाफरी यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी