शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

अप्पर वर्धा प्रकल्प उद्यान योजनेचा आराखडा मंत्रालयात धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 1:09 PM

Wardha News १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती.

ठळक मुद्दे२९ वर्षांपासून कार्यवाही नाहीचपर्यटकांची वाढतेय गर्दी पण, सुविधांचा अभाव कायमच

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला अप्पर वर्धा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांकरिता वरदान ठरला आहे. येथील उद्यानाला विकसित करून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात आराखडा तयार करून मंत्रालयात सादर केला. पण, आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही ही फाईल धूळखात पडून असल्याने ‘शासकीय काम २९ वर्षे थांब’, असा दफ्तरदिरंगाईचा अनुभव दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आला आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा तर अर्धा भाग मोर्शी विधानसभा क्षेत्रात येत असून हे दोन्ही विधानसभा क्षेत्र वर्धा लोकसभा क्षेत्राचा भाग आहेत.

अप्पर वर्धा धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी असते, त्यामुळे १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार विकास आराखडा तयार करून आॅगस्ट १९९१-९२ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी अप्पर वर्धा धरणाच्या तीरावरील प्रस्तावित उद्यानाच्या जागेची पाहणी केली. सोबतच राज्यातील खासगी वास्तुशास्त्र-डिझायनर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अप्पर वर्धा धरणाच्या विश्रामगृहात चर्चा झाली. त्यानंतर हा आराखडा मंजुरीकरिता मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याला आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही मंजुरी मिळाली नसून धूळखात पडला आहे. त्यामुळे येथील सुविधेअभावी पर्यटकांमध्ये नाराजीचा दिसून येत आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता या आराखड्याला मंजुरी देऊन विकास साधण्याची मागणी होत आहे.

आराखड्यात या गोष्टींचा होता समावेशउद्यानासाठी प्रकल्पाच्या उजव्या बाजूला ४५.७८ हेक्टर जमीन व डाव्या बाजूला ३८.८८ हेक्टर जमीन प्रस्तावित केली होती. या जमिनीवर बालोद्यान, धबधबा, वसतिगृह, उपाहारगृहे, दुकाने, लॉगहॅट, मॉडेल्स, तंबू वसाहत, रस्ते, पायवाटा, प्राणी व पक्षी, मत्स्य संग्रहालय, रोपटे, पवनचक्की, जलक्रीडा अंतर्गत वॉटर पार्क, निसर्ग उपचार केंद्र, योग केंद्र आणि पोलिस चौकी प्रस्तावित होती.

अप्पर वर्धा उद्यान योजना ही पूर्णत: धूळखात पडली असून शासनाने काही प्रमाणात येथे उद्यान योजनेकरिता केलेला खर्च व्यर्थ जात आहे. शासनाने नियोजनाप्रमाणे या उद्यानावर पूर्ण खर्च करून पर्यटन विकासाला चालना देवून देत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Governmentसरकार