शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या वीजतंत्रीची वीरूगिरी

By admin | Updated: August 17, 2015 02:19 IST

बाजार समितीचे विजतंत्री अनंता साटोणे व दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरीने ...

चर्चेतून मार्ग : विविध मागण्यांकरिता आंदोलनहिंगणघाट : बाजार समितीचे विजतंत्री अनंता साटोणे व दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरीने प्रशासन व नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सायंकाळी पोलिसांनी पुढाकार घेत समिती पदाधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली; परंतु तोडगा निघाला नाही. यावर तोडगा काढण्याकरिता बुधवारी बाजार समिती कार्यालयात उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता विजतंत्री अनंता साटोणे, सेवानिवृत्त कर्मचारी शरद कदम, छत्रपती चौधरी यांनी टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता पोलिसांच्या हस्तक्षेपाने झाली. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक लोणकर, मारोती उईके, शिपाई निरंजन वरभे, दिलीप आंबटकर, राजू तुळसकर, ऋषी घंगारे यांनी टाकीवर चढून आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. त्यानंतर नायब तहसीलदार अरविंद हिंगे यांनी साटोणे व अन्य कर्मचाऱ्यांशी बोलत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली. चर्चेच्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, नायब तहसीलदार हिंगे, बाजार समिती उपसभापती हरिष वडतकर, बाजार समिती सचिव तुळसीदास चांभारे, संचालक मधुसुदन हरणे, अशोक उपासे, सुरेश सातोकर, संजय कातरे उपस्थित होते. बरीच चर्चा होऊन सुद्धा तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांचे उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आंदोलनकर्त्यांसह संबंधीत अधिकारी उपस्थित राहणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)आंदोलकांच्या मागण्यानियमबाह्य निलंबन मागे घेणे, २००५ पासून पावच्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणे, २००९ पासून सहावे वेतन आयोग लागू करून थकबाकी देणे, निलंबन काळातील थकीत पगाराची पुर्तता, रोखलेली २०११ -१२ ची वार्षिक वेतनवाढ, बडतर्फ काळातील वेतन, तसेच बाजार समितीसाठी आणलेल्या साहित्याची रक्कम मिळणे या मागण्यांचा समावेश आहे. या संदर्भात गत अनेक वर्षांपासून निवेदन देवून, न्यायालयीन लढा देत व प्रशासनाने तोडगा काढून सुद्धा मागण्यांची पूर्तता नसण्याचा आरोप यावेळी करण्यात आला. समिती नियमानुसार काही मागण्या पूर्ण करून काहींची पूर्तता करण्याची प्रक्रीया सुरू असण्याचे समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.