शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचपर्यंतची मुभा असताना दुपारी दोन वाजताच बाजारपेठ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश कार्यान्वित केलेत. यात व्यावसायिक प्रतिष्ठाना संबंधित शिथिलता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत होती.

ठळक मुद्देग्राहकांचा दुष्काळ। केळझर, सेवाग्राम येथे संचारबंदी शिथिलतेनंतरचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : जिल्हा प्रशासनाने व्यावसायिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मुभा दिली असतानाही शनिवारला केळझरची बाजारपेठ दुपारी २ वाजताच बंद झाली. दोन नंतर ग्राहक फिरकतच नसल्याने दुकानात विनाकारण एकटेच कशासाठी बसायचे असा सवाल येथील दुकानदारांनी केला आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश कार्यान्वित केलेत. यात व्यावसायिक प्रतिष्ठाना संबंधित शिथिलता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत होती.या वेळेत रोटेशन पद्धतीने व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची मुभा होती. आणि नागरिकही या वेळेतच खरेदीसाठी घराबाहेर पडत होेते. परंतु शुक्रवारला जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश काढत सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिकांना दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली. परंतु केळझर मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडी ठेवली त्यामुळे दुपारी दोन नंतर केळझरच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी व जमावबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. सुधारित आदेश काढत प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शिथीलतेत वेळोवेळी बदल केला. काल परवा पर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ अशी शिथीलतेची वेळ होती त्यामुळे नागरिक या वेळेतच आपली कामे आटोपत असत. याची एकप्रकारे नागरिकांना सवयच झाल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. उन्हाचा वाढता पारा तर वादळी वातावरण यामुळे नागरिकही दुपारनंतर सहसा घराबाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली असली तरी दुपारी दोन वाजेनंतर ग्राहक फिरकतच नसल्याने दुकानात बसून उपयोग काय असा सवाल व्यावसायिक करताना दिसत आहे. ग्रामीण भागात जनजीवनावर परिणाम झाला.वेळ वाढला; पण ग्राहकच नसल्याने दुकाने बंदसेवाग्राम : जिल्हा प्रशासनाने दुकानदार आणि ग्राहकांची सोय व्हावी यासाठी शनिवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे पण; ग्राहकच नसल्याने मेडिकल चौकातील भाजीपाला,फळ दुकानदारांनी दुपारी २ वाजताच आपली दुकाने बंद करून घरचा रस्ता पकडला. गर्दी होऊ नये,शिस्त रहावी यासाठी दुकानदारांसाठी वेळेचे निर्बंध घालण्यात आले होते.सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू असायचे.नागरीकांना पण याची सवय लागली होती. पारा वाढल्याने लोकांनी दुपारनंतर घराबाहेर पडणे टाळले आहे.पाच वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी दुपारी दोन नंतर ग्राहक फिरकतच नसल्याने विनाकारण दुकानात बसण्यापेक्षा घरी गेलेले बरे- किशोर नखाते, किराणा व्यवसायी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार