शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे गावराणी आंबा झाला दुर्मिळ; भावही वधारले

By admin | Updated: May 15, 2016 01:49 IST

ग्रामीण परिसरात गावराणी आंबा दिसेनासा झाला आहे. यावर्षी आंब्याची नापिकी असल्याने भावही वधारले आहेत.

भाव १०० रुपये किलो : एकाच वृद्ध दाम्पत्याकडून होते लाडू आंब्याची शहरात विक्रीकारंजा (घा.) : ग्रामीण परिसरात गावराणी आंबा दिसेनासा झाला आहे. यावर्षी आंब्याची नापिकी असल्याने भावही वधारले आहेत. चांगल्या प्रतिचा आंबा १०० रुपये प्रती किलो विकला जात असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात १५ वर्षांपूर्वी गावराणी आंब्याचा सुकाळ होता. लाडू, खोबरा, साखऱ्या, राजा, राणी या विविध टोपण नावाने एकाहून एक सरस गुणधर्म आणि चव असलेले आंबे येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकायला येत होते. सकाळी ६ वाजता पासून तर ११ वाजेपर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या आंब्याची विक्री होत होती. २० ते २५ रुपये किलो भाव राहत होता. उमरी, धावसा, मदनी, चंदेवाणी, नारा, तरोडा, काकडा, सावळी, बोंदरठाणा, आजनडोह, मानीकवाडा, जुनापाणी, सेलगाव, बांगडापूर, धानोली, काजळी या सारख्या अनेक गावांत आंब्याच्या ‘आमराई’ दिसत होत्या. उन्हाळ्यात प्रारंभी कच्चे आंबे, नंतर पिकलेले आंबे विकण्याचा मोठा व्यवसाय प्रत्येक गावात चालत होता. आलेल्या पाहुण्यांना एकाहून एक सरस रसांचा मनसोक्त पाहुणचार होत होता; पण आज ते दिवस राहिले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी या झाडावर वानरे येतात, झाडांच्या सावलीमुळे अन्य पिके होत नाहीत आणि उन्हात या आंब्याची राखण कशी करायची, या अनेक समस्यांमुळे ही आंब्यांची झाडे विकली. आपल्याला थोडाफार पैसा मिळेल म्हणूनही क्षणिक स्वार्थापोटी आंब्याची उभी झाडे आरामशीन धारकांना विकण्यात आली. सध्या कारंजा तालुक्यात आंब्याची झाडे नामशेष होत चालली आहे. परिणामी, चांगले आंबे खायला मिळणे, दुर्मीळ झाले आहे. आंब्याचा तालुका म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या कारंजा तालुक्यात आज नावालाही गावराणी आंबे शिल्लक राहिले नाहीत. रासायनिक पदार्थाने पिकविलेले आरोग्यास हानीकारक इतर जातीचे आंबे खावे लागत आहेत. तालुक्यात मोठ-मोठ्या संत्रा बागा आहे. संत्रा दुसरीकडे पाठवायचा असल्यास लाकडी पेट्यांमध्ये द्यावा जातो. या पेट्या तयार करण्यासाठी आंब्याची खोड वापरली जाते. यामुळे अनेक संत्रा व्यापाऱ्यांनी आंब्याची उभी झाडे विकत घेऊन त्यापासून पेट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्याचेही दिसून येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही चिरीमरी घेऊन झाडे कटाईला परवानगी दिल्याचे दिसते. परिणामी, आज गावराणी आंब्याची झाडे आणि आंबे दिसेनासेच झाले आहेत. बसस्थानक परिसर, गोळीबार चौकात या महिन्यात एकेकाळी गावराणी आंबे विकणाऱ्यांची मोठी रांग लागत होती. एकाहून एक सरस चवीचे आंबे पाच वर्षांपूर्वी २० ते २५ रुपये किलो मिळायचे; पण आजच्या घडीला गावराणी आंबे विकायलाच येत नसल्याचे दिसते. आजनडोह येथील वयोवृद्ध दयारामजी रमधम आणि त्यांच्या पत्नीने अत्यंत मेहनतीने जोपासलेल्या लाडू आंब्याला यावर्षी नापिकी असतानाही भरपूर आंबे आलेत. दररोज हे जोडपे शहरात ५० किलो आंबे आणतात. १०० रुपये किलो दराने ते विकतात. आंब्याची चव व गुणवत्ता चांगली असल्यामुळे सकाळी दोन तासांतच आंबा विकला जातो. यातून ते आपला उदरनिर्वाह करतात.(तालुका प्रतिनिधी)आंब्याची विशाल झाडे झाली नामशेषरोहणा : उन्हाळ्यात गावराणी आंब्याच्या रसाची चव चाखायचे दिवस कालबाह्य झाले आहे. ग्रामीण भागातूनही गावराणी आंबे दुर्मीळ झाले आहे. परिणामी, अनैसर्गिकरित्या रसायनाने पिकविलेल्या आंब्याचा रस खाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शेताच्या बांधावर आंब्याची झाडे, रस्त्याच्या दुतर्फा आमराई, प्रत्येक शेतात स्वत:चे एक आंब्याचे झाड असलेच पाहिजे, ही शेतकऱ्यांची मानसिकता संपली आहे. आंब्याच्या झाडांची दरम्यानच्या काळात प्रचंड कत्तल झाली. नवीन आंब्याचे झाड लावून त्याचे संवर्धन करण्याबाबत उदासीनता असल्याने गावराणी आंब्याची विशाल झाडे नामशेष झालीत. परिणामी, ग्रामीण भागात घरोघरी गवतात वा मोहपानात लावलेले आंब्याचे माच नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे चोखणे, रस या बाबी कालबाह्य झाल्यात. जी काही आंब्याची झाडे आहे, त्यांनाही वाढत्या तापमानामुळे योग्य फळधारणा होत नाही. परिणामी, गावराणी आंब्याचा रस व लोणचे दुर्मिळ झाले. रसायनाने पिकविलेल्या पेवंदी आंब्याच्या रसाशिवाय पर्याय नाही. या रसाचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यताच अधिक असते. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासन प्रयत्न करीत असताना अपेक्षित बदल दिसत नाही. शेतातील आंब्याचे झाड सावली, फळे देण्यासह मातीची धुप थांबविते. पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते; पण याकडे दुर्लक्षच आहे.(वार्ताहर)