शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:06 PM

सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. जमिनीतील ओलावा पूर्वी सारखा नसल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना आक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नैसर्गीक पानवटेही अल्पावधीत आटणार आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अल्प पावसाचा विविध शेत पिकांना फटका बसला असून सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय कपाशी आणि तूर हे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करून वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा तसेच शेतकºयांना सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, अमृत मडावी, रमेश खेडकर, ज्ञानेश्वर वैद्य, भक्तराज अलोणे आदींची उपस्थिती होती.