शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बांध दुरूस्तीचे कामे प्राधान्याने करा

By admin | Updated: September 21, 2015 02:02 IST

जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व नादुरूस्त सिमेंट बंधाऱ्यासह जलसंधारणाचे दूरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करा.

शैलेश शर्मा : जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा घेतला आढावावर्धा : जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व नादुरूस्त सिमेंट बंधाऱ्यासह जलसंधारणाचे दूरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करा. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत, अशा सूचना सहकार विभागाचे प्रधान सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. शैलेश शर्मा यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालक सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, महावितरणाचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेताना खरीप हंगामासाठी विविध बॅँकांकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटपासंदर्भात आढावा डॉ. शर्मा यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, सर्वच शेतकऱ्यांना कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने नियोजन करताना कर्जाचे पुनर्गठन व प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करताना बॅँकांचा सहभाग वाढवावा. शेतकऱ्यांना सिंचनासाठी धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या व अपूर्ण असलेल्या १ हजार २८७ विहिरी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मनरेगांतर्गत विहिरींचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर असणाऱ्या सर्व मजुरांना वेळेवर मजुरी मिळेल यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समन्वय असावा, ज्या मजुरांचे जुलैपासून अद्यापर्यंत वेतन दिलेले नाही, ते तातडीने देण्याच्या सूचना डॉ. शर्मा यांनी केल्या. जिल्हा नियोजन मंडळाकडून विविध विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून त्यांनी आपल्या विभागामार्फत मंजुरी घेऊन खर्चाचे नियोजन करावे. जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावा घेताना डॉ. शर्मा म्हणाले, प्रत्येक विभागाने केलेल्या कामाचे सादरीकरण करावे. तसेच सिंचनासाठी व उत्पादन वाढीसाठी याचा काय प्रभाव झाला या संदर्भातही माहिती सादर करावी. भूजल सर्वेक्षण विभागाने भूजलाच्या पातळीत झालेली वाढ याबाबत तालुकानिहाय माहिती संकलित करावी. सावकारी कर्जमुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी. तसेच शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जातून मुक्त करण्याकरिता तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना डॉ. शर्मा यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती उपस्थितांना दिली.(स्थानिक प्रतिनिधी)आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेत केले सांत्वनसेवाग्राम येथील प्रमोद रमेश भोयर या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भोयर कुटुंबियांची भेट घेतली. तसेच आत्महत्या केलेल्या तरुणाच्या आई बेबी भोयर यांना भेटून सांत्वन केले. भोयर यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी त्यांच्यावर राष्ट्रीकृत बॅँकेचे कर्ज होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील व मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा उपस्थित होते.