शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्प हाऊसफुल्ल; दशकानंतर नदीपात्र झाले स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:35 IST

वर्धा जिल्ह्यात पावसाचा अजूनही जोर कायमच असल्याने जिल्ह्यातील जलाशयांची पाणी पातळी यंदा चांगलीच वाढली आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांनाही आला पूर गावांतील पाणीपुरवठा योजनेला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पावसाचा अजूनही जोर कायमच असल्याने जिल्ह्यातील जलाशयांची पाणी पातळी यंदा चांगलीच वाढली आहे. अशातच आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प शतप्रतिशत भरल्याने या धरणाचे सोमवारी रात्री ३१ ही दरवाजे उघडण्यात आले. या पाण्याच्या प्रवाहाने परिसरातील नदींना पूर आल्याने दशकानंतर सर्व नदी पात्रातील घाण स्वच्छ झाले आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा योजनांनाही मोठी बळकटी मिळाली आहे.आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धानदीवर निम्न वर्धा धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणाला ३१ दरवाजे असून या धरणातील पाणी वर्धा नदीसह यशोदा नदीसह इतरही नद्यांना मिळतात. त्यामुळे परिसरातील नदी-नाले फुगून जातात. या नदीपात्रावरुन अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणातील पातळी वाढली नसल्याने नद्यांनाही पूर आले नाही. परिणामी नदीपात्रात अस्वच्छतेसह पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या होत्या. गेल्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. पण, यंदा उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन झाले असून ते अद्यापही कायम असल्याने जलाशयांची कधी नव्हे इतकी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशायांपैकी जवळपास ५ जलाशय शतप्रतिशत भरले आहे. यात निम्न वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. सोमवारच्या मध्यरात्री या धरणाचे ३१ दरवाजे ३ सेमी ने उघडण्यात आले असून ९० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले दुथड्या भरुन वाहत असल्याने नदीपात्रही स्वच्छ झाले आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ या पुराने पुर्णत: वाहून गेल्याने नदीपात्रही खोल झाले आहेत. त्यामुळे भविष्यकालीन पाणी टंचाईचा प्रश्न सध्या तरी निकाली निघाला आहे.२९ गावांना सतर्कतेचा इशाराच्निम्न वर्धा धरणाच्या पाण्यामुळे वर्धा व यशोदा नदी काठावरील २९ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये वर्धा नदीपात्रालगत असलेल्या शिरपूर, खाडा, अंदोरी, कांदेगाव, रोहिणी, तांबा, हिवरा, सावंगी (येंडे), बाभुळगाव, निमगव्हाण, बोपापूर, आंजी (लहान), दहेगाव (धांदे), आपटी, नांदगाव, कवडगाव, वाघोली व पुलगाव या गावांसह वर्धा नदीशी संलग्न असणाऱ्या यशोदा नदी काठावरील डिगडोह, दिघी, बोपापूर, आलोडा, सरुळ, बोरगाव, टाकळी, जामणी, कोल्हापूर(सि) या गावांचा समावेश आहे.

प्रशासनाकडे सुरक्षेची वानवाच्वर्धा नदी काठावरील २९ गावे देवळी तालुक्यात येत असून वारंवार निर्माण होणाºया पूर परिस्थितीमुळे मालमत्ता, जनावर आणि बºयाचदा मनुष्यहानी होते. मात्र अशा परिस्थितीत नदीपात्रात तत्काळ मदत पोहोचण्यासाठी तालुका आपत्ती विभागाकडे एकही लाईफ बोट उपलब्ध नाही. याशिवाय लाईफ जॅकेत, १० फोल्डिंग स्टेचर, १ सर्चलाईट, १० प्रशिक्षित तराग, १० बचाव गॉगल्स, ३ गम बूट आणि १ प्रथमोपचार पेटी इतके साहित्य असून तालुका प्रशासन एवढ्या तोकड्या सामग्रीव्दारे लोकांचे जीव वाचू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Waterपाणी