शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: July 8, 2014 23:35 IST

शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली,

किसान अधिकार अभियानचे आंदोलन : नाफेडकडे थकले चुकाऱ्याचे कोट्यवधी रुपयेवर्धा/घोराड : शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली, चर्चा केली; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे त्रस्त होऊन सोमवारी किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले़ या प्रकरणी किसान अधिकारच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला़सेलू तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नाफेडला चना, तुरी विकल्यात़ रोखीने वा दहा दिवसांच्या आत चुकारे देण्याची हमी शासनामार्फत देण्यात आली होती; पण कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना चुकारेच देण्यात आलेले नाहीत़ यामुळे केवळ सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी ५२ लाख रुपये अडकले आहेत़ जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा येथील नाफेडची शासकीय आधारभूत हमी भावात किमतीनुसार खरेदी करण्यात आली. नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे २१ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे अद्यापही अदा करण्यात आले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे ५७ लाख रुपये नाफेडकडे अडकले आहेत़ ६ मे पासून चन्याचे चुकारेही देण्यात आलेले नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांचे २ कोटी ९५ लाख रुपये थकले आहेत़ चुकाऱ्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही शासनाकडून अद्याप तुरी व चन्याच्या चुकाऱ्यापोटी थकलेले ३ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ यावर्षी खरीप हंगामात अद्यापही पाऊस आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे़ खते, बी-बियाणे यांची खरेदी उसनवारीने केली़ आता पुन्हा बी-बियाणे, खते कसे खरेदी करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शासनाकडे रक्कम थकली असताना ती उपयोगी पडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या गंभीर बाबीकडे लक्ष देत शासनाने शेतकऱ्याचे तुरी व चण्याचे चुकारे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसान अधिकार अभियान व शेतकऱ्यांनी केली आहे़ यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले़यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण शेतकऱ्यांना मदत करू शकत नसेल तर ते प्रशासन काय उपयोगाचे, अशी भूमिका घेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन पूर्ण करण्यात आले़ यात किसान अधिकारचे मुख्य पे्ररक अविनाश काकडे, पंढरी ढगे, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)