शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

लॉकडाऊन इफेक्ट; पोलिसांकडून आरोपींना पोलीस कोठडीऐवजी कारागृहात पाठवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:58 PM

लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.

ठळक मुद्देहॉटेल्स, खानावळी बंद असल्याने आरोपींची खुराकही लॉक

राजेश सोळंकी।

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकटकाळात सर्व नागरिक घरी बसले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. मात्र, जेवणावळी, हॉटेल्स बंद असल्याने याचा फटका लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींनाही बसत आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.कोरोना विषाणू संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस विभागही रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे. एरव्ही गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारे आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करणारे पोलीसदादा आता नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहेत. एखादी घटना घडल्यास आरोपींचा मागोवा घेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी न्यायालयात तपास अधिकारी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करीत होते. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचे संक्रमण पाहता आणि लॉकडाऊनमध्ये जेवणावळी आणि हॉटेल्स बंद असल्याचे पाहून आरोपीला जेवण कोण देणार, याच विवंचनेत पोलीस बांधव असून परिणामी, त्यांच्याकडून न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी करताना दिसत आहेत.लॉकडाऊन असल्याने गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ घटना सोडल्या तर सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. मात्र, काही घटनेत अटक केलेल्या आरोपीला जेवण कोण देणार? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.कोणत्याही गुन्ह्यांत आरोपींना अटक केल्यावर त्या घटनेचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी मागतात. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केल्यावर आरोपी पोलीस कोठडीत असेपर्यंत त्याच्या दोनवेळच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था पोलिसांनाच करावी लागते. कोठडीत असलेल्या आरोपींसाठी एखाद्या खानावळ किंवा हॉटेलमधून त्यांच्यासाठी जेवणाचा डबा बोलाविण्यात येत असतो. पण, सध्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीसदादा अहोरात्र सेवा देत आहेत. या आणीबाणीच्या काळात मात्र, आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्तीही कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता आरोपीच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी न्यायालयापुढे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

कडाऊन असल्याने मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत घट झाली आहे. किरकोळ घटनांतील आरोपींना जामीन देण्याचे उच्च न्यायालयाचेच निर्देश आहेत. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला आहे. केवळ गंभीर गुन्ह्यातच आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात येत असून किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात येत आहे.- विनय घुडे, शासकीय अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस