शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

जांभुळ आरोग्यासाठी पोषकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM

पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे.

ठळक मुद्देपावसाळ्यात भरपूर खा : आजार पळविण्यासाठी बहुगुणी फळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. असा अभ्यासकांचा दावा आहे. विदर्भात विक्रीला येणारे जांभूळ हे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून येतात. याची अनेकांना माहिती नाही. कोरची तालुक्यातील जांभुळे दर्जेदार आहेत. नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात ते विक्रीसाठी पाठविले जातात. व नागपूरवरून वर्धा, यवतमाळ आदी भागात ते पुरवठा केले जातात.चार जातीच्या जांभळाचे होते उत्पन्नकोकण बहाडोली, गोकाक जातीच्या तीन प्रजातीत जांभळाचे उत्पन्न होते. जांभुळ औषधी गुणधर्माची असून यांचा उत्पन्न निसर्गाच्या वातावरणात जंगलात होत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक मूलद्रव्य जात नाहीत. त्यामुळे या कोरचीच्या जांभुळाला विशेष महत्त्व आहे.जांभुळ उपचारजांभुळ फळापासून मधुमेह, अंथरून ओले करणे, रक्ती हगवण, जुलाब, दात आणि हिरड्या दुखी, जंत, घसा त्रास, मुळव्याध, ऊलटी, फुफ्फुस, मूतखडा, जखम, पांढरे जळालेले डाग, कीडा चावल्यावर आदी आजारांवर उपचार करता येतो.या आजारांवर जांभुळ रामबाण औषधजांभुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभुळ उपयुक्त आहे.जांभुळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.जांभुळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निधून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोन-तीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.पिकलेली जांभुळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाबही बंद होतात.हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा, त्यामुळे रक्त थांबते.जांभुळाची बी पाण्यात उगाळून घामोळ््यावर लावले असता घामोळे कमी होते.जांभुळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते.

जांभुळ वृक्षाचा उपयोगजांभुळ वृक्षाचे लाकुड मजबुत आणि पाणी रोधक आहे, कृषी अवजारे, बैलगाडी चाके, घरकाम आदीकरीता लाकडाचा उपयोग होतो. पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या ठिकाणी जसे डिझेलपंपाच्या खाली, विहिरीमध्ये पाट्या वापरतात, प्रक्रियायुक्त पदार्थ- जॅम, जेली, चिप्स, वाईन, विनेगार, स्क्वॅश, लोणचे आदी, रेल्वे गाड्यांमध्ये आसने तयार करण्याकरीता, इंधन आणि कोळसा निर्मितीकरीता, पानांच्या उपयोग दंतमंजन तयार करण्याकरीता, पशुखाद्याकरीता, टसर अळ््यांचे अन्न, तेलाचा उपयोग साबण आणि अत्तर करीता, औषधी निर्मितीकरीता, कापड उद्योगामध्ये रंगकाम आणि कातण्याकरीता जांभुळ मध्य-मधमाशी पालन यात वृक्षाचा उपयोग होतो.