शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघ, जनता पार्टी ते भाजप वाटचालीत पहिले यश आर्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये दोन जागांवर मिळविला भाजपने विजय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज ज्या भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे, त्या भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.१९६२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत जनसंघाचे उमेदवार म्हणून हिंगणघाटमधून यशवंत वसंत सरोदे रिंगणात होते. त्यांना १,६६६ मते मिळाली. याच निवडणुकीत वर्ध्यावरून विठ्ठल तुकाराम मेश्राम, पुलगाववरून गणपत सदाशिव चांदेकर यांनी निवडणूक लढविली. मेश्राम यांना ३,६७१, चांदेकर यांना ५,३४१ मते मिळाली. त्यानंतर भारतीय जनसंघाकडून १,९६७ ला वर्ध्यातून आर.डी.सावल निवडणूक लढलेत. सावल यांना ३,९७३ मते मिळाली. त्यानंतर १९७२ मध्ये पुलगाव मतदारसंघातून भारतीय जनसंघाकडून रामराव बापूजी पोहेकर यांनी निवडणूक लढविली. पोहेकरांना १,२७३ मते मिळाली होती. त्याचवर्षी हिंगणघाट मतदार संघातून विठ्ठल कोसुरकर भारतीय जनसंघाकडून मैदानात होते. कोसुरकरांना २,६०५ मते मिळाली. १९७८ ला जनता पक्षाकडून आर्वी मतदारसंघातून धैर्यशील विनायक राव वाघ यांनी निवडणूक लढविली. वाघ यांना निर्णायक ११ हजार ८९० मते मिळाली. त्यांनतर एकदम १९९० मध्ये पुलगाव मतदारसंघातून विजयकुमार निवल तर वर्धा मतदारसंघातून पुरुषोत्तम इंगळे निवडणूक लढलेत. निवल यांना ५,१९७ तर इंगळे यांना ३,४४१ मते मिळाली. त्यानंतर १९९५ ला आर्वी मतदारसंघातून भाजपकडून दादाराव यादवराव केचे यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना ४६९४ मते मिळाली. तर पुलगाव मतदारसंघातून पुरुषोत्तम फुलकरी निवडणूक लढले. फुलकरींना १२,४१९ मते मिळाली. १९९९ मध्ये पुलगाव मतदारसंघातून चरणसिंग चावरे, आर्वीतून विजयराव मुडे या दोघांनी भाजपकडून निवडणूक लढविली. यात चावरे यांना १५,४५९ तर विजय मुडे यांना ३१,२५४ मते मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये आर्वीतून दादाराव केचे निवडणूक लढलेत. त्यांना ४५ हजार ८६१ मते मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये आर्वीतून पुन्हा दादाराव केचे निवडणूक लढले. त्यांना ७१ हजार ६९४ तर पुलगावमधून रामदास तडस यांना ५४ हजार ८२० मते मिळाली. या संपूर्ण जनसंघ, जनता पार्टी ते भाजप या प्रवासात २००९ मध्ये दादाराव केचे विजयी झालेत. हाच भाजपचा वर्धा जिल्ह्याच्या इतिहासातील पहिला विजय होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत वर्धा व हिंगणघाट या दोन मतदारसंघात भाजपने आपले आमदार निवडून आणले आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला राजकीयदृष्ट्या ‘अच्छे दिन’ आले.

टॅग्स :Electionनिवडणूक