शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 5:00 AM

आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले.

ठळक मुद्देआलोडीतील चित्र : साटोडा ग्रा.पं. प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतीअंतर्गत आलोडीतील वॉर्ड क्रमांक सुखकर्तानगर, बुरांडे ले-आउट येथे खुल्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवकाकडून समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले. २ एकराच्या खुल्या जागेतील पाणी प्लास्टिक पाइपमधून निघणार नसल्याचे नागरिकांनी प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नागरिकांनी लोकवर्गणीतून १ फूट डायमीटरचे सिमेंट पाइप आणून दिले. मात्र, ग्रामसेवकाने आडमुठे धोरण अवलंबवित पाइप टाकण्यास टाळाटाळ केली. सिमेट पाइपमधून जात असलेले पाणी पुढे काढण्याकरिता शासकीय जागेतून नाली खोदकामाची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था कायम आहे. यामुळे ४० ते ५० घरांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे.सुखकर्तानगरात मूलभूत सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता आणि खुल्या जागेतील पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे गृह व इतर कर न भरण्याचा नागरिकांनी पवित्रा घेतला आहे.ग्रामसेवक, प्रशासकाच्या अनागोदी कारभाराची चौकशी करीत साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुधा सहारे, मनीषा डाखोरे, विनोद ठिकरे, राजेश गारोडे, गजानन कुंभारे, किशोर चरडे, प्रवीण गंगासागर, रवी कापरे यांच्यासह २६ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.साटोडयाचे प्रशासक बेपत्तासाटोडा ग्रामपंचायतीची मुदत संपली असून ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, प्रशासक चौधरी आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता असून भ्रमणध्वनीही बंद असल्याने कामाचा खोळंबा झालेला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRainपाऊस