शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

अवैध वाळूसाठा चोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

ठळक मुद्देचर्चेला फुटले पेव : अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वर्धा नदीघाटातून अज्ञाताने अवैध वाळूची वाहतूक करीत मौजा काकडदरा येथील कब्रस्तानात ३० ब्रास रेती (किंमत १ लाख २० हजार रुपये) ची साठवणूक केली होती. हा वाळूसाठा मंडळ अधिकारी तळेगाव व सहकाऱ्यांनी १६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास पंचनामा करुन जप्त करण्यात आला होता.जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.३० ब्रास वाळूची चोरी होणे हे दोन-चार तासांच्या कालावधीचे काम नसून इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला वाळूसाठा उचलून नेण्याकरिता चार ते पाच ट्रॅक्टरला ८ ते १० तासांचा कालावधी नक्कीच लागत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.८ ते १० तासाच्या कालावधीत रेती चोरटे कुणाच्या कसे निदर्शनास पडले नाही? यात मोठे अर्थकारण घडले असावे काय, त्यामुळेच वाळूचोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात पडला नसावा, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे.कापसी घाटातून अवैध वाळूउपसामोझरी (शे) - नजीकच्या कापसी येथील वर्धा नदीतून वाळूतस्तकरांकडून रात्रंदिवस वारेमाप चोरट्या मार्गाने वाळूउपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू आहे. यात शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे. कापसी घाटातून कापसी-मोझरी शेकापूरमार्गे ट्रॅक्टरद्वारे वाळूचोरीचा गोरखधंदा बिनदिक्कमतपणे सुरू असतो. वाळूतस्कारांनी मार्गावर ठिकठिकाणी खबरे तैनात केलेले असतात. चोरीची वाळू भरलेली वाहने कुठल्याही अधिकाºयांच्या हाती लागू नये म्हणून कानगाव, मोझरी, कापसी येथून शासकीय वाहनांवर पाळत ठेवली जाते. खबºयांकडून तस्करांना माहिती पुरविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे कापसी ते मोझरी तसेच कालव्यांनी निघणाºया मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. असे असताना वाळूतस्करांना पाठीशी का घालण्यात येत आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. वाळूतस्करांवर कारवाई करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू