शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवैध वाळूसाठा चोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

ठळक मुद्देचर्चेला फुटले पेव : अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वर्धा नदीघाटातून अज्ञाताने अवैध वाळूची वाहतूक करीत मौजा काकडदरा येथील कब्रस्तानात ३० ब्रास रेती (किंमत १ लाख २० हजार रुपये) ची साठवणूक केली होती. हा वाळूसाठा मंडळ अधिकारी तळेगाव व सहकाऱ्यांनी १६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास पंचनामा करुन जप्त करण्यात आला होता.जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी १७ जानेवारीला तळेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ३० ब्रास वाळूसाठा चोरी प्रकरणाच्या तपासात अद्याप सत्य पुढे न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.३० ब्रास वाळूची चोरी होणे हे दोन-चार तासांच्या कालावधीचे काम नसून इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला वाळूसाठा उचलून नेण्याकरिता चार ते पाच ट्रॅक्टरला ८ ते १० तासांचा कालावधी नक्कीच लागत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.८ ते १० तासाच्या कालावधीत रेती चोरटे कुणाच्या कसे निदर्शनास पडले नाही? यात मोठे अर्थकारण घडले असावे काय, त्यामुळेच वाळूचोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात पडला नसावा, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे.कापसी घाटातून अवैध वाळूउपसामोझरी (शे) - नजीकच्या कापसी येथील वर्धा नदीतून वाळूतस्तकरांकडून रात्रंदिवस वारेमाप चोरट्या मार्गाने वाळूउपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू आहे. यात शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष का, असा नागरिकांचा सवाल आहे. कापसी घाटातून कापसी-मोझरी शेकापूरमार्गे ट्रॅक्टरद्वारे वाळूचोरीचा गोरखधंदा बिनदिक्कमतपणे सुरू असतो. वाळूतस्कारांनी मार्गावर ठिकठिकाणी खबरे तैनात केलेले असतात. चोरीची वाळू भरलेली वाहने कुठल्याही अधिकाºयांच्या हाती लागू नये म्हणून कानगाव, मोझरी, कापसी येथून शासकीय वाहनांवर पाळत ठेवली जाते. खबºयांकडून तस्करांना माहिती पुरविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे कापसी ते मोझरी तसेच कालव्यांनी निघणाºया मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. असे असताना वाळूतस्करांना पाठीशी का घालण्यात येत आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. वाळूतस्करांवर कारवाई करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू