शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

शरीरात वात दोष वाढत असेल तर आयुर्वेदात सांगितलाय हा साधा सरळ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:57 IST

काळजी घ्यावी : अंगाला दररोज तेलाची मालिश करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शरीराची सतत झीज होत असते. हालचाली, विचार करणे, निर्णय घेणे, जागरण करणे, मैथूनकर्म करणे, काळाचा परिणाम म्हणून, वात वाढविणाऱ्या अन्नाचे अतिरिक्त सेवन आदी कारणांमुळे शरीरातील वातदोष वाढू लागतो. आयुर्वेदात कफ दोषासाठी वमन, पित्तदोषासाठी विरेचन आणि वात दोषासाठी बस्ती, असे उपचार आयुर्वेदाने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे कफविकारांसाठी मध खाणे, पित्त विकारांसाठी तूप व वात विकारांसाठी सर्वांगाला तेल लावणे, या साध्या उपचार करता येत असल्याचे तज्ज्ञानी सांगितले.

वात दोष हा वायू व आकाश या महाभूतापासून बनला आहे. म्हणून, त्याचे निराकारण करण्यासाठी आणि आयुष्य निरोगी, दृढ, बलवान आणि हितकर होण्यासाठी आयुर्वेदाने अंगाला दररोज तेल लावण्यास सांगितलेले आहे. तिळापासून निघते ते तेल, हेच तेल गरम करून संपूर्ण अंगाला शरीरावरील केसांच्या दिशेने लावल्यास म्हातारपण उशिरा येते, शरीर आणि मनाचे श्रम नष्ट होतात, वात दोषाचे शमन होते, दृष्टी बलवान होते, शरीराला पुष्टी येते, त्वचा नितळ व सतेज होते, आतड्यांचे बल वाढते, प्रगाढ निद्रा येऊ लागते. शारीरिक आणि मानसिक आजारांसाठी शरीर व मन सक्षम बनते, अम्लपित्त, वाताचे रोग, त्वचाविकार, केसांच्या तक्रारी, मेंदूच्या तक्रारी, मानसिक विकृती इ. इतर आजारांसाठी औषधी सिद्ध तेल किंवा तूप उत्तम गुण देतात.

वातदोष वाढल्यास या समस्या उद्भवू शकतातअवयव सुकणे, रूक्ष त्वचा, अवयवांचे विस्फार होणे, हाता-पायाला मुंग्या येणे, संधिवात, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, फुटल्याप्रमाणे वेदना होणे, मोडल्याप्रमाणे वेदना होणे, कंप सुटणे, कठीणपणा येणे, नख व केस दुभंगणे, स्वभाव क्रूर बनणे, मस्तिष्काचा संकोच होणे, वृक्काचा आकार लहान होणे, अवयव खाली सरकणे आदी आजार उत्पन्न होतात. एकंदरीतच शरीरात रूक्षपणा, शीतपणा, हलकेपणा, खरखरीतपणा, चलत्व याची आतोनात वाढ होऊन दूर्धर वातविकारांचाही यातूनच जन्म होतो.

१५ मिनिटे तेलाची मालिश बहुउपयोगीनिरनिराळ्या आजारांसाठी तेल दररोज अंघोळीपूर्वी, रात्री झोपताना किमान १५ मिनिटे शरीरावरील केसांच्या दिशेने चोळून लावावे. त्वचेवरील भ्राजक पित्त, रसधातू, स्वेदवहन करणाऱ्या पोकळ्या, रोमकूप आणि वातदोष यांच्या साहाय्याने ही औषधी तेल शरीरातील आजार घालवतात. 

विविध आजारासाठी तेल वापरण्याच्या या आहेत पद्धती

  • अम्लपित्त नष्ट होण्यासाठी बेलफळ आणि शतावरीचे तेल, म्हातारपण दूर राहण्यासाठी महाविष्णू तेल लावावे. वृक्काचा आकार बारीक होत असल्यास मासे आणि बेलफळ यांचे तेल किंवा तूप पाठीच्या मणक्यात जिरवावे. दम्येकरी लोकांना अळशी आणि लाखेच तेल छातीला लावण्यासाठी वापरावे.
  • कोरडा खोकला असणाऱ्या लोकांनी ज्येष्ठमधाचे तेल वापरावे. हाड ठिसूळ झालेली असताना पिंड तेल संपूर्ण अंगास लावावे आणि गंध तेल अर्धा-अर्धा चमचा गरम पाण्यासह पोटात घ्यावे, इसब, गजकर्ण इ. त्वचा विकारांना करंज तेल, निंब तेल आणि कडू कवठीचे तेल समभाग एकत्र करून लावावे.
  • मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर कमी येण्यासाठी प्रमेहमिहिर तेलाचे अभ्यंग द्यावे. निद्रानाश झालेल्या लोकांनी हिमसाखर तैल नखशिखांत लावावे. नाकाचे हाड वाढलेल्या लोकांनी चित्रकादी तेल नाकात घालून नाक आणि गालाला लावावे. संधीवातामुळे सांधे वाकडे झाले असल्यास विशिष्ट शेकांसहीत सिद्धार्थक तेलाचा वापर करावा.
  • हाता-पायाच्या मुंग्या कमी होण्यासाठी पद्मकाही तेल लावावे. गुडघेदुखी आणि कंबर, मानदुखी कमी होण्यासाठी कोट्टमचुक्यादी तेल उपयोगी पडते. आमवात नावाच्या आजारासाठी शक्यतो अंगाला तेल लावू नये क्वचित प्रसंगी महाविषगर्भ तेल या रुग्णांना वापरता येते.

"असा एकही विकार शरीरात नाही की, ज्यासाठी आयुर्वेदाने तेलांचा आणि तुपांचा अंतर्बाह्य वापर केलेला नाही, त्यामुळे तज्ज्ञ वैद्यांकडून आपल्या विकारांसाठी योग्य तेल/तूप निवडून त्याचा वापर उटणे, लावणे आणि शेक देणे यासह केल्यास पोटात घेत असलेल्या कुठल्याही पॅथीच्या औषधांनी कमी वेळात दीर्घकाळ आराम मिळू शकतो."- डॉ. मिलिंद सज्जनवार, आयुर्वेद तज्ज्ञ वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धाHealth Tipsहेल्थ टिप्स