शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

देशात सामाजिक न्यायाची संकल्पना रुजायला हवी

By admin | Updated: October 22, 2014 23:23 IST

सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. किंबहुना सामाजिक न्यायाचा अभिलेख म्हणजे भारतीय संविधान होय. आजच्या सुमारास भारतात सतत वाढत जाणारी पराकोटीची गरीबी, सामाजिक विषमता,

वर्धा : सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. किंबहुना सामाजिक न्यायाचा अभिलेख म्हणजे भारतीय संविधान होय. आजच्या सुमारास भारतात सतत वाढत जाणारी पराकोटीची गरीबी, सामाजिक विषमता, स्त्री-पुरुष भेदभाव याबाबी सामाजिक न्यायाच्या मार्गातील अडसर ठरत आहे. याकरिता सर्व जागरुक नागरिकांनी सर्व स्तरावर विषमता निर्मूलनाची मोहीम राबवून देशात सामाजिक न्यायाची संकल्पना रूजवावी असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एस. कासारे यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. प्रमुख उपस्थिती प्रा. रवींद्र बेले, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. राजेश भटकर, प्रा. वैशाली देशमुख यांची होती.यावेळी सामाजिक न्याय व लोकशाही या विषयावर झालेल्या विचारमंथनात डॉ. कासारे यांनी विविध मुद्दे मांडले. भारतातील उपेक्षित पीडितांना रोजगाराची समान संधी, स्त्रीयांना विकासप्रक्रियेत समान वाटा मिळावा. मुख्यत: सामाजिक न्यायाशी संबंधित तरतूदी संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये असून नागरिकांनी सजग राहून शासनाकडून त्याची अंमलबजावणी करुन घेतली तरच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होईल, असे विचार व्यक्त केले. यानंतर बोलताना डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना समाजाप्रती सहकार्य व बांधिलकीची जाणीव जोपासण्याचे आवाहन केले. याकरिता समाजाच्या विकासात योगदान द्यावे, तसेच त्यांनी यासाठी अभ्यासाचा व्यासंग जोपासत सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन करीत यातून येणाऱ्या पिढ्यावर सामाजिक न्यायाचे संस्कार होईल, लोकशाहीत वर्तमान नागरिकांप्रमाणेच भावी नागरिकांनाही महत्त्वाचे स्थान असते, असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय बोबडे यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल सोनाली सालोडकर हिला मान्यवरांनी सन्मानित केले. कार्यक्रमाचे संचालन सुरज कांबळे यांनी केले तर आभार अपर्णा नारायणे यांनी मानले. तसेच अभ्यासमंडळ गठित करण्यात आले. यावेळी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)