शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अतिवृष्टीने साहूरात शेतकऱ्यांची ज्वारी काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.

ठळक मुद्देओढविले संकट : शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे काळ्या मातीच्या कुशीत वाढलेली हिरवीगार पीक क्षणार्धात मातीसारखे काळे झाले. राजेंद्र गावंडे यांच्या शेतातील ज्वारी पूर्णत: खराब झाली आहे. शासनाने मात्र अद्यापही मदतीचा हात दिलेला नाही.साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.सोयाबीनला कोंब फुटले, काळी पडली, आराजी घटली, कपाशीलाही तेच दिवस आले. त्यामुळे खरीपातील हक्काची पीक न पेरलेली बरी अशी प्रतिक्रिया गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा अद्यापही सर्व्हे केला नाही. कृषी आयुक्त, महसुल आयुक्त, ग्रामविकास विभागाचे आयुक्त यांचा कुठलाही शासन आदेश नाही. यावरून बळीराजा किती खचला असेल याची कल्पनाही करवत नाही. शासनाने तात्काळ सरसकट नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रूपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशीच अनेक शेतकºयांची स्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती