शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना ५० लाख द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध ठराव पारित : शेत जागर मंचची जंगल परिषद

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाने जंगलव्याप्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी काटेरी कुंपण निशुल्क करून द्यावे, असे ठराव बांगडापूर येथे पार पडलेल्या शेत जागर मंचाच्या जंगल परिषदेत पारित करण्यात आले.या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या सभेमध्ये अकोला येथील कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी जंगल परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज शेतकरी पेरणीपासून शेतमाल निघेपर्यंत शेतात रात्री जागतो. परंतु जंगलात रोही, डुकर, हरिण, वाघ आदी वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वनविभाग पंचनामा करून इतर कागदपत्राची पुर्तता केल्यावरही नाममात्र मदत हातात ठेवतात. त्यामुळे या परिसरातील अर्धी अधिक जमीन पडीत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहचावी या येथे जंगल परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे गावंडे यांनी सांगितले. सदर जंगल परिषदेची सांगता शेतकºयांनी आणलेल्या शिदोºयामधील अन्नग्रहण करून अभिनव पध्दतीने करण्यात आली. या परिषदेला कन्नमवारग्राम, हेटीकुंडी, सावळी, आगरगाव, बोरी, धर्ती, नांदोरा (हेटी), सिंदीविहीरी, आंभोरा आदी गावातील शेतकरी, शेतमजुर उपस्थित होते. या जागरण परिषदेचे कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही सदस्य होवू शकता व आपल्या परिसरातील जनतेला सोबत घेवून आपणच आपले प्रश्न सोडवावे असेही आवाहन करण्यात आले. जंगल व्याप्त भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.जागर परिषदेचे काम हे अकोला जिल्ह्यात सुरू झाले. आज संपूर्ण राज्यात या परिषदेचे काम सुरू होत आहे. कुणाकडून वर्गणीसुद्धा घेतली जात नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. या संघटनेत कोणतेही पद नाही.- रवी पाटील (अरबट),अकोला.

टॅग्स :Tigerवाघ