शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना ५० लाख द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM

या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध ठराव पारित : शेत जागर मंचची जंगल परिषद

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाने जंगलव्याप्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी काटेरी कुंपण निशुल्क करून द्यावे, असे ठराव बांगडापूर येथे पार पडलेल्या शेत जागर मंचाच्या जंगल परिषदेत पारित करण्यात आले.या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बापुराव कडवे, मनोहर पठाडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या सभेमध्ये अकोला येथील कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी जंगल परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज शेतकरी पेरणीपासून शेतमाल निघेपर्यंत शेतात रात्री जागतो. परंतु जंगलात रोही, डुकर, हरिण, वाघ आदी वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वनविभाग पंचनामा करून इतर कागदपत्राची पुर्तता केल्यावरही नाममात्र मदत हातात ठेवतात. त्यामुळे या परिसरातील अर्धी अधिक जमीन पडीत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहचावी या येथे जंगल परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे गावंडे यांनी सांगितले. सदर जंगल परिषदेची सांगता शेतकºयांनी आणलेल्या शिदोºयामधील अन्नग्रहण करून अभिनव पध्दतीने करण्यात आली. या परिषदेला कन्नमवारग्राम, हेटीकुंडी, सावळी, आगरगाव, बोरी, धर्ती, नांदोरा (हेटी), सिंदीविहीरी, आंभोरा आदी गावातील शेतकरी, शेतमजुर उपस्थित होते. या जागरण परिषदेचे कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही सदस्य होवू शकता व आपल्या परिसरातील जनतेला सोबत घेवून आपणच आपले प्रश्न सोडवावे असेही आवाहन करण्यात आले. जंगल व्याप्त भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.जागर परिषदेचे काम हे अकोला जिल्ह्यात सुरू झाले. आज संपूर्ण राज्यात या परिषदेचे काम सुरू होत आहे. कुणाकडून वर्गणीसुद्धा घेतली जात नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. या संघटनेत कोणतेही पद नाही.- रवी पाटील (अरबट),अकोला.

टॅग्स :Tigerवाघ