शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

पुस्तकातील गांधी आश्रमात प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले

By admin | Updated: July 23, 2015 02:04 IST

संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश प्रेषित करीत असलेल्या वास्तूत आम्ही आज वास्तव्याला आहोत हे खरच स्वप्नवत आहे.

सेवाग्राम आश्रमात वैद्यकीय विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर : श्रमाचे महत्त्व आणि सेवेची प्रेरणा मिळण्यासाठी १९६९ मध्ये सुरू झाला उपक्रम दिलीप चव्हाण सेवाग्रामसंपूर्ण जगात अहिंसेचा संदेश प्रेषित करीत असलेल्या वास्तूत आम्ही आज वास्तव्याला आहोत हे खरच स्वप्नवत आहे. आरोग्यसेवा हे मिशन समजूनच वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहोत. आतापर्यंत पुस्तकातून पाहिलेले गांधीजी येथे रोज प्रत्यक्षात भेटतात. आपण आधी एक सामान्य माणूस आहोत ही भावना येथे मनात पक्की होते. अशा बोलक्या भावना कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात भारत भरातून वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झालेले आणि युवा पिढीचे प्रातिनिधी असलेले विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. गांधीजींच्या सहवासात आरोग्य सेवेचे व्रत घेऊन डॉ. सुशिला नायर यांनी कस्तुरबा आरोग्य संस्था व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या माध्यमातून अखंड आरोग्यसेवा सुरू केली. बापूंचे विचार आणि तत्वांवर आधारित संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गांधी जीवनाचा साक्षात्कार व्हावा आणि लोकसेवेचे बाळकडू मिळावे यासाठी १५ दिवसांचे संस्कार शिबिर नई तालिम समिती आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान परिसरात सुरू आहे. यातून विद्यार्थी मातीशी नाते, ग्रामीण क्षेत्राचे वास्तविक जीवन आणि आश्रमीय जीवन पद्धती अनुभवत आहे. केवळ पुस्तकातून आतापर्यंत भेटलेले गांधी ही मुले आज प्रत्यक्षात अनुभवत आहे.४६ वर्षांपासून श्रमदानाची परंपरा कायम १९६९ मध्ये महात्मा गांधी आयुर्विज्ञानची स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचे पंधरा दिवसांचे संस्कार शिबिर घेतले जाते. सध्या देशभऱ्यातील ३० मुली आणि २९ मुले या शिबिरात सहभागी झाली आहेत. प्रवेश घेतल्या घेतल्याच सर्व विद्यार्थी वसतिगृहाऐवजी नई तालिम परिसरात आहेत. सकाही चार ते रात्री दहा असे वेळा पत्रक असून यात प्रात: प्रार्थना, योगसाधना, श्रमदान, सूतकताई व्याख्यान, खेळ, मुक्त वेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि शेवटी दिनक्रमाचे लेखन असे दैनिक कार्यक्रम आहे.हा वेगळाच आनंद...देशभरातील विविध जाती धर्मातील, गावखेड्यापासून तर महानगरात राहिलेली मुले येथे श्रमाचा अनुभव घेत आहेत. यातील अनेकांचा तर माती, श्रमदान, प्रार्थना एवढेच नव्हे तर सामूहिक जीवनाशी संबंधच आलेला नाही. आतापर्यंत गांधीयन थॉट्स या माध्यमातून त्यांनी गांधीजी अनुभवले ते केवळ परीक्षेपुरतेच. पण सेवाग्राम आश्रमात मात्र खऱ्या अर्थाने त्यांना गांधीजी कळत आहे. संस्काराचे बिजारोपण होत आहे. येथे राहण्याचा वेगळाच आनंद आम्ही अनुभवत असल्याचे हे विद्यार्थी सांगतात.