शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

काँग्रेसमधील गटबाजीमुळे अशोक शिंदेंचा ‘ना’राजीनामा; दीड वर्षातच पक्षाला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:26 AM

पत्रपरिषदेत माहिती : माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा रामराम

वर्धा : शिवसेना पक्ष सोडून तब्बल दीड वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजीला त्रस्त होऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा देखील पाठविल्याची माहिती २३ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

दीड वर्षापूर्वी कार्यकर्त्यांच्या सहविचाराने मी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माझा पक्ष प्रवेश दिल्लीत होणार होता पण, तांत्रिक कारणामुळे मुंबईत झाला. त्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्य कमिटीचे उपाध्यक्ष पद देण्याचे ठरविले. पण, तसे झाले नाही. हे पद अमरावती येथील डॉ. सुनील देशमुख यांना दिले. तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, चारुलता टोकस यांना हिंगणघाट विभागातील कामाच्या याद्या दिल्या. २५/ १५ च्या कामांची यादी दिली. विविध कार्यक्रम घेतले मात्र, जिल्ह्यातील गटबाजीमुळे ही सर्व कामे परस्पर इतरांना दिली.

गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला ग्रासले असून याला जिल्ह्यातील पदाधिकारी कारणीभूत आहेत, असा आरोप अशोक शिंदे यांनी केला. माझ्या कार्याची दखल तर घेतलीच नाही शिवाय माझा सोशल रिस्पेक्टही हिरावून घेतला यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून माझ्यासह समुद्रपूर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच जवळपास एक हजारांवर कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Shindeअशोक शिंदेcongressकाँग्रेसwardha-acवर्धाNana Patoleनाना पटोले