शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

वर्धा जिल्ह्यात यंदा चारा टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 3:06 PM

गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजलस्तर आटला अनेक गावांना दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांतील जनावरे दुसऱ्या गावात स्थानांतरित करण्यात येत आहेत.जिल्ह्यात खरिपात प्रमुख पीक कापूस व सोयाबीन हेच आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न मार्च महिन्यानंतर भेडसावू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही भागात सोयाबीनचे कुटार चारा म्हणून वापरले जाते. परंतु, यावर्षी सोयाबीनवरही रोग आला. उत्पादन घटले, त्यामुळे चाºयाची टंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी भूगर्भातच पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामीण व शहरी भागात केला जाणारा पाणीपुरवठा कपात करण्यात आला आहे. वर्धा शहरासह ११ गावांना दरररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात होता. धाम नदी, पवनार व येळाकेळी येथून पाणीपुरवठा कमी होत असल्याने शहरात आता दहा दिवसानंतर नळ येतात. मोठ्या गावांमध्येही ही परिस्थिती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेतकरीही यावेळी अडचणीत आहे. प्रशासनाने आष्टी तालुक्यात चारा छावणी मंजूर केली आहे, मात्र अद्याप छावणी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्यातील या गावात पाणी कमी आहे. तेथे चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे मोठ्या प्रमाणावर स्थानांतरित केली जात आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई