शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

By admin | Updated: April 30, 2017 01:04 IST

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, ...

तहसीलदारांना निवेदन : सावकारांना बेड्या ठोकण्याची मागणीहिंगणघाट : स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. सर्व शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर किसान सभेद्वारे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार यादव व उपविभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.सावकारीच्या पैशात शेताची विक्री करून घेऊन शेती हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकारांना बेड्या ठोका. वहिवाटदार म्हणून शेताच्या सात-बारावर नोंद घेण्याची सर्व प्रकरणे निकाली काढावी. सिलींग जमिनीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील गोविंदपूरचे प्रकरण त्वरित निकाली काढावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात यशवंत झाडे, जगन चांभारे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, भास्कर डवरे, प्रशांत चरडे, गजानन काळे, देवेंद्र शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, रामभाऊ खेलकर, विनोद दातारकर आदंचा समावेश होता. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले. राज्य उपाध्यक्ष झाडे यांनी जगाला जगविणारा, धान्य पिकविणारा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो. दरवर्षी ५ हजारांहून अधिक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात. या आत्महत्यांचे सत्र आता त्यांच्या कुटुंबात मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे; पण राज्य व केंद्र शासनाला याची चिंता नाही. आम्हाला दिल्ली-मुंबईच्या तक्तावर बसवा, राज्य द्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे पूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. सत्तेसाठी सर्व काही, ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ असा अनुभव शेतकरी भाजपाच्या राज्यात घेत असल्याचे दिसते. दोघांच्याही राज्यात शेतकरी आत्महत्या व शेतमाल लुटीची प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन संघर्ष करावा व न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, जानराव नागमोते, संजय भगत, पांडुरंग राऊत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जगन चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत चरडे यांनी मानले. धरणे आंदोलनामध्ये किसान सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा व आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्ती राखुंडे, प्रफुल लढी, निलेश चरडे, श्रीकृष्ण बावणे, विनोद नगराळे, गुलाब घाटे, बाबाराव वैरागडे, कवडू मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)