शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आजही समस्यांवर गांधी विचारातूनच जातोय समाधानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:25 IST

बापूंची १५५ वी जयंती: दहा वर्षे सेवाग्रामात राहिले वास्तव्य

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सत्य, अहिंसा, शांती आणि सत्याग्रहाचे शस्त्र जगाला महात्मा गांधीजींनी दिले. त्यांचा कार्यकाळ वेगळा असला तरी आधुनिक काळातही गांधी प्रासंगिक असल्याचे दिसून येते. देशातच नव्हे, तर जगात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांच्या समाधानाचा मार्गसुद्धा त्यांच्याच विचारांतून जातो. म्हणूनच आजही गांधी विचाराशिवाय पर्याय नसल्याचे सातत्याने अभ्यासक आणि विचारवंत सांगतात. त्यांची २ ऑक्टोबरला १५५ वी जयंती असून, स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिलेल्या आश्रमात अखंड सूत्रयज्ञ, सामूहिक प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांतून आदरांजली वाहिली जाते. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अहिंसेचे उद्‌गाता म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची जयंती 'जागतिक अहिंसा दिवस' म्हणून साजरी केली जाते. बापूंनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सत्याची कास धरली. अहिंसेने समस्येचे समाधान होते, शांतीने मार्ग निघतो आणि कुठलीही हिंसा न करता आपल्या ध्येयावर कायम राहून सत्याचा मार्ग पत्करणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत याचा पुरेपूर उपयोग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यात देशवासीयांचा सहभागही उल्लेखनीय राहिला. गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाचा प्रयोग अमेरिकेत काळ्या लोकांवरील अत्याचाराविरोधात मार्टिन ल्युथर किंग यांनी लढा उभारून यशस्वी केला, तर दक्षिण आफ्रिकेतील निग्रोसाठी नेल्सन मंडेला यांनीही हाच मार्ग निवडला. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रे आहेत, ज्यांनी गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा दिला आणि यशस्वी झाले. यावरून जगातील बलाढ्य राष्ट्रसुद्धा बापूंच्या विचारांचेच अनुसरन करतात आणि आजही हाच मार्ग सर्वांसाठी योग्य नी न्यायिक असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून व्यक्ती नसले तरीही त्यांचे विचार हे अमर असल्याचे दिसून येत आहे. 

बापूंचे एकादश व्रत मार्गदर्शकच गांधीजीच्या विचारांची सुरुवात अंतिम व्यक्त्तीच्या गरजेपासून होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांनी यांचाच विचार अगोदर केला, उत्पादनवाढीत लोकांचा विचार व्हावा. रोजगार वाढला पाहिजे, अधिक नफा यावर भर नको आणि एकाच्या हातात मालकी हक्क नको असाही आग्रह होता, पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यांचे परिणामही भोगावे लागत आहेत; पण या समस्येच्या निराकरणासाठी मानवांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे, असा आग्रह बापूंचा होता. औद्योगिक क्रांती दिलासा देणारी ठरली असली तरी यातूनच चंगळपणा, उपभोग आणि पुढे प्रदूषण वाढून समस्या वाढत गेली; पण गरजा काही संपत नाही, यासाठी कमीत कमी गरजा, पर्यावरण हास न करता संवर्धन, युज अॅड थ्रो प्रवृत्ती बदलावी लागण्याची सूचनाही एकादश व्रतांतून बापूंनी केल्या आहेत.

गांधीजींचे जीवन प्रेरणादायक बापूंचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक आणि मार्गदर्शक नक्कीच आहे. बापूंच्या विचारांवर आस्था दाखविणारे अभ्यासक, कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असंख्य असल्याने 'गांधींना मरण नाहीच', अशीच त्यांची भावना आहे. सेवाग्राम येथील आश्रमाकडे लोकांचा कल वाढला असून, तो सकारात्मक संदेश देण्याचे काम करीत आहेत. नव्या पिढीने गांधीजींचा विचार मार्ग समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठी गांधी संस्थांनी आणि ज्येष्ठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गांधी विचारच समाधानाचा मार्ग असल्याचे जनमानसातील चर्चेतून समोर येत असून, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

शेती, गोशाळा आश्रमाचा पाया सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या कार्य आणि विचारांची माहिती लोकांना व्हावी यासाठी मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर सेवारत आहेत. कापसापासून कापड तयार करणे या कामातून आजही पर्यटकांना बापूंच्या कार्याची ओळख होत आहे. चरखा, अंबर चरखा, विणाई यंत्र आणि त्यामागील अर्थशास्त्र यांचे ज्ञान होते. शेती आणि गोशाळा हा आश्रमाचा पाया असून, याची ओळख आश्रमातील उपक्रमातून होत आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीwardha-acवर्धा