शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या गैरहजेरीचा उमेदवारांनाही बसतोय फटका

By admin | Updated: October 3, 2014 02:06 IST

केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही बळकट व्हावीे, निवडणुका निष्कलंक पार पडाव्या यासाठी विविध उपाययोजना केल्यात़ याचाच एक भाग म्हणजे ‘आदर्श आचार संहिता’ होय़

प्रशांत हेलोंडे वर्धाकेंद्र व राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही बळकट व्हावीे, निवडणुका निष्कलंक पार पडाव्या यासाठी विविध उपाययोजना केल्यात़ याचाच एक भाग म्हणजे ‘आदर्श आचार संहिता’ होय़ निवडणुकीत चालणारे अनेक गैरप्रकार या संकल्पनेमुळे बंद झालेत़ असे असले तरी उमेदवार, राजकीय पक्ष आणि पदाधिकारी, कार्यकर्तेही यातून पळवाटा काढत कायद्याबाहेर जातातच़ यावर अधिक लगाम कसण्याकरिता निवडणूक काळात परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे़ याचा फायदा गैरप्रकार टाळण्याकरिता झाला; पण काही भागात उमेदवारांना याचा फटकाही बसत आहे़ हा प्रकार ग्रामीण भागात अधिक प्रकर्षाने जाणवतो़१५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली़ यावेळी झालेल्या चिन्हवाटपानंतर खऱ्या प्रचाराला प्रारंभ झाला़ जिल्ह्यातील चारही मतदार संघामध्ये खऱ्या अर्थाने प्रचार यंत्रणा कामी लागली असून भोंगे वाजू लागले आहेत़ या घरी, त्या घरी फिरून कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत़ प्रचार सभा, संमेलने, मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे़ पत्रके वाटणे, बॅनर लावणे, पोस्टर लावणे आदी प्रकारातून प्रचार करण्यासही मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे़ हा प्रकार शहरात दिसून येत असला तरी ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी झाल्याचे तुर्तास दिसून येत आहे़ शहरांमध्ये नगर पालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय यांच्यावर परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ शहरांमध्ये पालिका तसेच अन्य कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहत असल्याने सहज परवानगीही मिळत आहे; पण ग्रामीण भागात असे होताना दिसत नाही़ ग्रामीण भागात प्रचार साहित्यासाठी ग्रामसेवकांमार्फत परवानगी काढावी लागते़ यासाठी तत्सम अर्ज ग्रामसेवकांकडे सादर करावा लागतो़ यानंतर ते परवानगी देतात़ यासाठी संबंधित ग्रामसेवक उमेदवार वा त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणे आवश्यक आहे़ गत कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत़ यामुळे अनेक गावांचा कारभार कार्यभारावरच चालविला जातो़ जिल्ह्यातील बहुतांश गावांचा कारभार कार्यभारावरच आहे़ एका ग्रामसेवकाकडे किमान तीन ते चार गावांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे़ इतकेच नव्हे तर २० ते ४० किमी अंतरावरील गावे ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आली आहेत़ यामुळे ग्रामसेवकाला आपल्या गावाचा कारभारही धड पाहता येत नाही आणि कार्यभार असलेल्या गावाकडेही लक्ष देता येत नाही़ या प्रकारामुळे गावांचा विकासही खोळंबल्याचे चित्र आहे़ आता निवडणूक असल्याने याचा फटका उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही बसत असल्याचे दिसते़ चारही मतदार संघामध्ये निवडणुकीच्या प्रचार तोफा गरजू लागल्या आहेत़ यात गावांमध्ये प्रचार करण्याकरिता ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या परवानगीची गरज उमेदवारांना पडते़ यासाठी तत्सम अर्जही केला जातो; पण ग्रामसेवकच उपलब्ध राहत नाही़ यामुळे उमेदवारांना परवानगी प्राप्त करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते़ ग्रामसेवकांनी तीन ते चार गावांचा कार्यभार असल्याने प्रत्येक गावात दिवस ठरविले आहेत़ त्याच दिवसावर ग्रामसेवक त्या गावात जातात़ त्या दिवशी मुख्यालयाचे बोलवणे आल्यास सदर गावात पूढील आठवड्यात पोहोचतात़ यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी ताटकळावे लागते़ हा प्रकार आता उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतही घडत असल्याचे दिसून येत आहे़ परवानगीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व कधीकाळी उमेदवारांनाही चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़निवडणूक प्रचारासाठी अत्यल्प कालावधी असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहेत़ या धावपळीत परवानगीच घ्यायची राहिल्याने अनेकांची गोची होत असल्याचे दिसते़ असे असले तरी उमेदवारांना परवानगी घेऊनच प्रचार करावा लागणार आहे़ अन्यथा आचार संहिता भंग केल्याबाबतचा गुन्हा दाखल होईल, हे निश्चित!