शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

प्रेमभंगातून युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:06 IST

आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देमदना शिवारातील घटना : शेतातील विहिरीत घेतली दोघांनी उडी, परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मदना शिवारातील युवराज पुनवटकर यांच्या शेतातील विहिरीत या प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आले असून छगन उर्फ बंटी प्रल्हाद (२४) आणि रजनी दिलीप तुमडाम (२१) दोन्ही रा. मदना, असे मृतकांची नावे असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.रजनी आणि बंटी हे दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. त्यांनी विवाह करण्याचा शपती घेतल्या. मात्र, घरच्यांना यांच्यातील प्रेमाची माहिती नसल्याने दुसरीकडे लग्न जुळवून साखरपुडा उरकविण्यात आला. तेव्हापासून दोघेही आपल्या प्रेमाचे काय या विवंचनेत होते. त्यांनी आपले दु:ख लपवून ठेवले. रात्री एक वाजताच्या सुमारास घरातील मंडळी झोपून असताना पुनवटकर यांचे शेत गाठले. तेथे त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. बंटी व रजनी घरी नसल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांकडून शोधाशोध सुरू करण्यात आली. परंतु, रात्री त्याचा शोध लागला नाही. दरम्यान बुधवारी सकाळी सदर दोघांचे मृतदेह पुनवटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आले. या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलीस पाटील अमित धोपटे यांच्याकडून माहिती मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, जमादार कामडी, प्रेमराज बावणे, मनिष मसराम यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय दोन्ही मृतदेय उत्तरिय तपासणीसाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या. सदर प्रकरणी खरांगणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.‘रजनी’ बीएससी नर्सिंग झालेली तर ‘बंटी’ रामपचा कर्मचारीसुमारे तीन वर्षांपूर्वी रजनी आणि बंटी यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतरण झाले. तेव्हापासून ते एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. मृतक रजनी हिचे शिक्षण बीएससी नर्सिंग झाले असून मृतक बंटी हा राज्य परिवहन महामंडाळाचा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. एक महिन्यानंतर रजनी हिचा साखरपुडा झालेल्या मुलासोबत विवाह होणार होता, हे विशेष.सिंचनादरम्यान विहिरीने तळ गाठल्याने प्रकार आला उजेडातशेतकरी पुनवटकर यांनी त्यांच्या शेतात गव्हाची लागवड केली आहे. बुधवारी गव्हाला विहिरीतील पाणी देण्याचे काम सुरू असताना काही वेळाने विहिरीने तळ गाठला. याच दरम्यान शेतकºयाने विहिरीत डोकाहून पाहिले असता विहिरीत दोन मृतदेह असल्याचे पुढे आले. याची माहिती शेतकºयाने ग्रामस्थांना देत पोलिसांना दिली.

टॅग्स :Deathमृत्यू