शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

वर्ध्यात कोविड मृत्यू नियंत्रणासाठी चाचणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 3:44 PM

वर्धा जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२२ हजार ५२३ चाचण्या२१ हजार ४६० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाली असून कोविड मृत्यू नियंत्रणासाठी कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन या दोन पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या कोविड चाचणी केलेल्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे.

शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळता येतो, हे लक्षात आल्यावर आरोग्य विभाग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अ‍ॅन्टिजेन किटद्वारे ६ हजार १२१ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८१ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह तर ५ हजार ८४० व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर १६ हजार ४०२ व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच १५ हजार ६२० व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस