शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:38 AM

आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते.

ठळक मुद्देराम शिंदे : आदर्श गाव विदर्भ विभागीय कार्यशाळा व आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते. याच धर्तीवर आदर्शगावाची कामे गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा आदर्शगाव राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी दिल्यात.आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेची विदर्भस्तरीय विभागीय कार्यशाळा व आढावा बैठक आज सेवाग्राम येथे यात्री निवासमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक कैलास मोते, अमरावतीचे सहसंचालक गवसाने, सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव, माधव कोटस्थाने सेवाग्रामच्या सरपंच रेश्मा जामलेकर उपस्थित होत्या.गाव आदर्श करण्यासाठी येणाºया अडचणींचा आढावा घेऊन अडचणी सोडविण्यासाठी संबंधीत अधिकाºयांना सूचना दिल्या जातील. अडथळा निर्माण करणाºया अधिकाºयांवर कारवाईचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. आदर्शगावासाठी आलेला निधी त्याचवर्षी खर्च करावा. निधी अखर्चित राहणे गावाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. निधी एक वर्षात खर्च केल्यास निधी वाढवून देण्याची हमी सुद्धा त्यांनी दिली.यावेळी एकनाथ डवले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून राज्यातून पहिल्या आलेल्या काकडदरा या गावाचा मंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार योजनेवर आधारीत सिडीचे प्रकाशन, आदर्शगाव मासिकाचे प्रकाशन व पूजा उमरेडकर व कराटेपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कैलास मोते यांनी तर संचालन उपसंचालक कापसे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर भारती यांनी व्यक्त केले. यावेळी ३१ गावांतील सरपंच, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था आणि अधिकारी उपस्थित होते.२५ वर्षांत २५ गावे आर्दश करू - पोपटराव पवारआदर्श गाव योजनेला १९९२ मध्ये सुरुवात झाली. त्याला २५ वर्ष पूर्ण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाच्या कामावर भर देऊन गावे दुष्काळमुक्त करण्यासोबतच उपजिवीकेसाठी गावांचे स्थलांतर होणार नाही यावर काम व्हावे. २५ वर्षात २५ आदर्श गावे शासनाला दाखवून द्यायची आहेत.पहिल्या दहा गावांमध्ये ५ गावे विदर्भातील आहेत. विदर्भासमोर विदर्भातीलच गावांचे उदाहरण समोर ठेवले तर इतर गावांनाही त्यांची प्रेरणा मिळेल. पाणी जिरवणे, पाणी साठवणे, आणि साठलेल्या पाण्याचा विवेकाने व सामाजिक भान ठेवून उपयोग करणे महत्त्वाचे आहे. या योजनेत वर्धेतील १० गावांची निवड व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.